शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

३३५ मुला-मुलींनी काढला घरातून पळ

By admin | Updated: January 17, 2017 02:50 IST

२०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मुंबई : रेल्वे स्थानकांत अनेक अल्पवयीन मुले-मुली रेल्वे पोलिसांना सापडतात. त्याबाबत तक्रार दाखल झालेली असल्याने रेल्वे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आणि त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. २०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील ३३५ मुला-मुलींनी घरातून विविध कारणांस्तव पळ काढला होता, अशी माहिती देण्यात आली. मुंबईचे आकर्षण, अभ्यासासाठी पालकांचा दबाव, अंतर्गत वादविवाद आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले-मुली घर सोडून मुंबई गाठतात. मुंबई गाठण्यासाठी त्यांच्याकडून ट्रेनने प्रवास करण्यावर भर दिला जातो. मात्र मुंबईत आल्यानंतर आसरा नसल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांतच आपले बस्तान मांडतात. अशा मुला-मुलींचे पालक त्यांचा शोध घेतानाच रेल्वे पोलिसांकडेही तक्रार करतात. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून त्यांचा यशस्वीरीत्या शोध घेतला जातो. २०१६मध्ये मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ५७२ मुले-मुली सापडली. यात ३३५ जणांनी घरातून पळ काढला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर १५ केसेस या अपहरणाच्या, ५९ केसेस या स्थानकात येताच गर्दीत पालकांचा हात सुटल्याच्या आहेत. तसेच १३९ केसेस या बेपत्ता असल्याच्या आहेत. याशिवाय १२ केसेस या तस्करी तर अन्य १२ केसेस या मानवी तस्करीच्या आहेत. (प्रतिनिधी)