शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

By admin | Updated: March 5, 2016 02:55 IST

मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे

नवी दिल्ली : मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.शेतीला व्यवहार्य बनविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे विविध योजना राबवीत आहेत, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षभरात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २००१ पासूनचा आत्महत्यांचा हा उच्चांक आहे,’ असे सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून ३०४९.३६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे, असेही कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.१२ लाख हेक्टर शेतजमिनीचा वापरच नाहीदेशात १२ लाख हेक्टर शेतजमीन कुठल्याही वापराशिवाय पडली असून विविध राज्यांमध्ये पट्टे देण्यासंदर्भात असलेले स्वतंत्र कायदे हे यामागील एक मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यसभेत हा खुलासा केला. शेतीयोग्य जमीन कंपन्या आणि उद्योगांना दिली जाण्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. या शंकांचे निरसन करताना या बैठकीचे उद्योगांशी काहीही देणेघेणे नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे १,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात १,१३०, नाशिक विभागात ४५९, नागपूर विभागात ३६२, पुणे विभागात ९६ आणि कोकण विभागात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.३,२२८ पैकी १,८१९ प्रकरणे अनुदानास पात्रया ३,२२८ आत्महत्या प्रकरणांपैकी १,८४१ प्रकरणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरली आहेत, तर ९०३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ४८४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.