शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

By admin | Updated: March 5, 2016 02:55 IST

मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे

नवी दिल्ली : मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.शेतीला व्यवहार्य बनविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे विविध योजना राबवीत आहेत, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षभरात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २००१ पासूनचा आत्महत्यांचा हा उच्चांक आहे,’ असे सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून ३०४९.३६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे, असेही कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.१२ लाख हेक्टर शेतजमिनीचा वापरच नाहीदेशात १२ लाख हेक्टर शेतजमीन कुठल्याही वापराशिवाय पडली असून विविध राज्यांमध्ये पट्टे देण्यासंदर्भात असलेले स्वतंत्र कायदे हे यामागील एक मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यसभेत हा खुलासा केला. शेतीयोग्य जमीन कंपन्या आणि उद्योगांना दिली जाण्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. या शंकांचे निरसन करताना या बैठकीचे उद्योगांशी काहीही देणेघेणे नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे १,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात १,१३०, नाशिक विभागात ४५९, नागपूर विभागात ३६२, पुणे विभागात ९६ आणि कोकण विभागात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.३,२२८ पैकी १,८१९ प्रकरणे अनुदानास पात्रया ३,२२८ आत्महत्या प्रकरणांपैकी १,८४१ प्रकरणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरली आहेत, तर ९०३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ४८४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.