शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची

- अनिल गवई, खामगाव (बुलडाणा)धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून, तब्बल ३२ वर्षांनंतर २५० एकर माळरानावर हिरवळ फुलवली. ही यशोगाथा आहे, पिंपरी धनगर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सामूहिक लढ्याची. १९८७-८८ साली मन प्रकल्पाचे काम सुरू झाले, त्यावेळी पिंपरी धनगर हे गाव या प्रकल्पाच्या पात्रात येत असल्यामुळे गावाचे जलाशयापासून ६०० मीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. सधन आणि सुखसंपन्न गावाच्या इतिहासाला त्याचवेळी जलसमाधी मिळाली. पुनर्वसित ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे काहींनी गाव सोडले. वस्तुत: मन प्रकल्पातील सहा टक्के जलसाठा पुनर्वसित गावासाठी आरक्षित असताना केवळ प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे जलाशयाचे पाणी त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे हळूहळू आंदोलन उभे राहीले. या लढ्यामुळे १६ मे तसेच २६ डिसेंबर २०१३ आणि २५ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध प्रशासकीय मान्यतांचे प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे प्रिंपी धनगर येथील ग्रामस्थांना जलाशयातील पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर जानेवारी २०१६च्या पहिल्या आठवड्यात प्रिंपी येथील २७ शेतकऱ्यांना जलाशयाचे पाणी मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग आणि गव्हाचे उत्पादन घेतले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले असून, अनेकांच्या शेतात कांद्याचे पीक बहरत आहे.गोवऱ्या वेचणाऱ्या हातांना मिळाला रोजगार!शेती पिकत नसल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी गावातून स्थलांतर केले होते. काहींनी माळरानावरील गोवऱ्या वेचून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला; मात्र आता तब्बल २५० एकर जमीन ओलिताखाली आल्याने ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. वनविभागाकडे एक लाखाचा भरणा!लोकवर्गणीतून पिंप्री धनगरवासीयांनी वन विभागाकडे १ लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला. वृक्ष लागवडीसाठी आता हे गावकरी धडपडत आहेत. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या माळरानावर ३२ वर्षांनंतर हिरवळ फुलली आहे. या आंदोलनाला यश आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे.- आशाताई सुनील जाधव, सरपंच, पिंप्री धनगर, खामगाव