शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची

- अनिल गवई, खामगाव (बुलडाणा)धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून, तब्बल ३२ वर्षांनंतर २५० एकर माळरानावर हिरवळ फुलवली. ही यशोगाथा आहे, पिंपरी धनगर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सामूहिक लढ्याची. १९८७-८८ साली मन प्रकल्पाचे काम सुरू झाले, त्यावेळी पिंपरी धनगर हे गाव या प्रकल्पाच्या पात्रात येत असल्यामुळे गावाचे जलाशयापासून ६०० मीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. सधन आणि सुखसंपन्न गावाच्या इतिहासाला त्याचवेळी जलसमाधी मिळाली. पुनर्वसित ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे काहींनी गाव सोडले. वस्तुत: मन प्रकल्पातील सहा टक्के जलसाठा पुनर्वसित गावासाठी आरक्षित असताना केवळ प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे जलाशयाचे पाणी त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे हळूहळू आंदोलन उभे राहीले. या लढ्यामुळे १६ मे तसेच २६ डिसेंबर २०१३ आणि २५ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध प्रशासकीय मान्यतांचे प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे प्रिंपी धनगर येथील ग्रामस्थांना जलाशयातील पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर जानेवारी २०१६च्या पहिल्या आठवड्यात प्रिंपी येथील २७ शेतकऱ्यांना जलाशयाचे पाणी मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग आणि गव्हाचे उत्पादन घेतले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले असून, अनेकांच्या शेतात कांद्याचे पीक बहरत आहे.गोवऱ्या वेचणाऱ्या हातांना मिळाला रोजगार!शेती पिकत नसल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी गावातून स्थलांतर केले होते. काहींनी माळरानावरील गोवऱ्या वेचून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला; मात्र आता तब्बल २५० एकर जमीन ओलिताखाली आल्याने ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. वनविभागाकडे एक लाखाचा भरणा!लोकवर्गणीतून पिंप्री धनगरवासीयांनी वन विभागाकडे १ लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला. वृक्ष लागवडीसाठी आता हे गावकरी धडपडत आहेत. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या माळरानावर ३२ वर्षांनंतर हिरवळ फुलली आहे. या आंदोलनाला यश आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे.- आशाताई सुनील जाधव, सरपंच, पिंप्री धनगर, खामगाव