शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या गणेशोत्सवाचे ३२वे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 03:20 IST

तृतीयपंथीय गेली ३२ वर्षे कोपरी गावातील भवानीमाता मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करीत आहेत. तृतीयपंथीयांची वस्ती असणारे कोपरीगाव, महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे

प्राची सोनवणे, नवी मुंबई तृतीयपंथीय गेली ३२ वर्षे कोपरी गावातील भवानीमाता मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करीत आहेत. तृतीयपंथीयांची वस्ती असणारे कोपरीगाव, महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी तृतीयपंथीय कोपरी गावात वास्तव्यास आले तेव्हा, स्थानिक नागरिक द्विधा मन:स्थितीत होते. समाजात नेहमीच तिरस्काराची वागणूक मिळणारे हे तृतीयपंथी गणेशोत्सवानिमित्त १० दिवस एकत्र येण्याचा प्रयत्न करतात.गावातील हे तृतीयपंथी दिवसाला जमा होणाऱ्या पैशांतून काही हिस्सा या गणेशोत्सवासाठी देत असतात. १९८२ पासून कोपरी गावातील तृतीयपंथीयांकडून नवरात्रोत्सव व गणेशोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबईत जे. टी. बी. डोंगरावरील तृतीयपंथीयांचा सार्वजनिक गणेशोत्सव वगळता मुंबईत या पंथाचा दुसरा गणपती नाही. मात्र नवी मुंबईतील कोपरी गावाच्या वेशीवर (जुन्या) गेली अंबा मातेच्या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन होते. ३० वर्षांपूर्वी या तृतीयपंथीयाने काही हजारात येथील ग्रामस्थांकडून जागा विकत घेतली. पै-पैसा करून येथे एक अंबामातेचे मंदिर बांधले. आता त्या मंदिरात गणेशोत्सव आणि नवरात्र हे दोन मोठे धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शांती पुजारी यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती.गणेशेत्सवात नाच, गाणी, भजन हा असा गणपती जागरणाचा कार्यक्र म असतो. या जागरणासाठी गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, ठाणे, मुलुंड, भांडुप या मध्य रेल्वेच्या पट्ट्यातील अनेक तृतीयपंथी येथे येतात. घणसोलीतील मूर्तीकार रोहिदास पाटील यांच्या कुंचल्यातून साकार झालेली गणेश मूर्ती तृतीयपंथी घेऊन येतात. ही मूर्ती आणताना या तृतीयपंथीयांचा उत्साह काही औरच असतो. कोपरी नाक्यापासून वाजत-गाजत ही मूर्ती अंबामातेच्या मंदिरापर्यंत आणली जाते.अशीच मिरवणूक गणेश विसर्जनासाठी काढली जाते. आजूबाजूचे २०० ते ३०० तृतीयपंथीय या मिरवणुकीत सामील होतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस सायंकाळच्या आरतीनंतर संगीताच्या तालावर होणारा नृत्याचा कार्यक्र म हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकाला समाजात मानाचे स्थान मिळावे याकरिता बाप्पाकडे साकडे घालणार असल्याची माहिती महेशदिली(पिंकी) पुजारी यांनी दिली. समाजातील एकोपा टिकून राहावा अशी प्रार्थना बाप्पाकडे केली जाणार आहे. दुय्यम वागणूक मिळणा-या या समाजाला बरोबरीचे स्थान मिळावे अशीच अपेक्षा असल्याचीही प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.