शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तृतीयपंथीयांच्या गणेशोत्सवाचे ३२वे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 03:20 IST

तृतीयपंथीय गेली ३२ वर्षे कोपरी गावातील भवानीमाता मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करीत आहेत. तृतीयपंथीयांची वस्ती असणारे कोपरीगाव, महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे

प्राची सोनवणे, नवी मुंबई तृतीयपंथीय गेली ३२ वर्षे कोपरी गावातील भवानीमाता मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करीत आहेत. तृतीयपंथीयांची वस्ती असणारे कोपरीगाव, महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी तृतीयपंथीय कोपरी गावात वास्तव्यास आले तेव्हा, स्थानिक नागरिक द्विधा मन:स्थितीत होते. समाजात नेहमीच तिरस्काराची वागणूक मिळणारे हे तृतीयपंथी गणेशोत्सवानिमित्त १० दिवस एकत्र येण्याचा प्रयत्न करतात.गावातील हे तृतीयपंथी दिवसाला जमा होणाऱ्या पैशांतून काही हिस्सा या गणेशोत्सवासाठी देत असतात. १९८२ पासून कोपरी गावातील तृतीयपंथीयांकडून नवरात्रोत्सव व गणेशोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबईत जे. टी. बी. डोंगरावरील तृतीयपंथीयांचा सार्वजनिक गणेशोत्सव वगळता मुंबईत या पंथाचा दुसरा गणपती नाही. मात्र नवी मुंबईतील कोपरी गावाच्या वेशीवर (जुन्या) गेली अंबा मातेच्या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन होते. ३० वर्षांपूर्वी या तृतीयपंथीयाने काही हजारात येथील ग्रामस्थांकडून जागा विकत घेतली. पै-पैसा करून येथे एक अंबामातेचे मंदिर बांधले. आता त्या मंदिरात गणेशोत्सव आणि नवरात्र हे दोन मोठे धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शांती पुजारी यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती.गणेशेत्सवात नाच, गाणी, भजन हा असा गणपती जागरणाचा कार्यक्र म असतो. या जागरणासाठी गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, ठाणे, मुलुंड, भांडुप या मध्य रेल्वेच्या पट्ट्यातील अनेक तृतीयपंथी येथे येतात. घणसोलीतील मूर्तीकार रोहिदास पाटील यांच्या कुंचल्यातून साकार झालेली गणेश मूर्ती तृतीयपंथी घेऊन येतात. ही मूर्ती आणताना या तृतीयपंथीयांचा उत्साह काही औरच असतो. कोपरी नाक्यापासून वाजत-गाजत ही मूर्ती अंबामातेच्या मंदिरापर्यंत आणली जाते.अशीच मिरवणूक गणेश विसर्जनासाठी काढली जाते. आजूबाजूचे २०० ते ३०० तृतीयपंथीय या मिरवणुकीत सामील होतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस सायंकाळच्या आरतीनंतर संगीताच्या तालावर होणारा नृत्याचा कार्यक्र म हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकाला समाजात मानाचे स्थान मिळावे याकरिता बाप्पाकडे साकडे घालणार असल्याची माहिती महेशदिली(पिंकी) पुजारी यांनी दिली. समाजातील एकोपा टिकून राहावा अशी प्रार्थना बाप्पाकडे केली जाणार आहे. दुय्यम वागणूक मिळणा-या या समाजाला बरोबरीचे स्थान मिळावे अशीच अपेक्षा असल्याचीही प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.