शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

तंत्रनिकेतनचे ४९ पैकी ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण

By admin | Updated: July 7, 2016 17:36 IST

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. ७ : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अंतिम वर्षाच्या ४९ विद्यार्थ्यांपैकी अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर पत्रिका तपासणीत घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या ना त्या समस्यांमुळे विद्यार्थी जेरीस आलेले आहेत. गुणवत्तेबाबत देखील महाविद्यालयाने दुर्लक्ष केल्याने येथे प्रवेश घेण्यास देखील विद्यार्थी कचरतात. आता निकालाबाबत महाविद्यालयातील विद्यार्थी संतापले आहेत. अंतिम वर्षाला महाविद्यालयात ४९ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात तब्बल ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांनाही जेमतेमच गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुर्नरमुल्यांकनासाठी अर्ज केला असता त्यांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची उत्तर पत्रिकेची झेरॉक्स प्रत देण्यात आली. त्या प्रतमध्ये उत्तर पत्रिकेतील तपासणीची तफावत असल्याचे स्पष्ट झाले. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर पत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर तपासणीमध्ये प्रश्नांचे उत्तर बरोबर असून देखील ते चुकीचे आहे असे दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहा गुण मिळतील त्या ठिकाणी त्यांना केवळ एक किंवा दोन गुण दिले आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देखील तपासण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उत्तर पत्रिकेतील घोळामुळे येथील महाविद्यालयातील जवळपास ३२ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला.