शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना ३२ कोटींची लक्ष्मी पावणार

By admin | Updated: November 2, 2016 20:20 IST

दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे.

ऑनलाइन लोकमत/मिलिंदकुमार साळवे अहमदनगर, दि. 02 - दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तब्बल ३२ कोटी रुपयांची लक्ष्मी जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना पावणार आहे.यावर्षी (२०१६) जुलै व आॅगस्टमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे. या कालावधीत राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अधिक उत्पादनामुळे कांद्याचे भाव राज्यभरातच गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. त्यानंतर राज्यभरातूनच कांदाउत्पादकांना सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी झाली. या मागणीची व शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेत राज्य सरकारने जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात बाजार समितीच्या आवारात अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फत कांदाविक्री करणाऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याची मर्यादा घालण्यात आली.त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारात विक्री केलेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांना स्वत:च्या नावे असलेला सातबारा उतारा, कांदा विक्रीच्या हिशेब पावतीच्या छायांकित प्रती, बँक बचत खाते क्रमांक, संपूर्ण नाव व पत्त्यासह कांदा अनुदान मागणी अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी सुरुवातीस २२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदान मागणी अर्ज सादर करण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती.नगर जिल्ह्यात ३२ लाख शेतकऱ्यांना लाभया मुदतीत अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडे २ लाख १७ हजार ४०७ लाभार्र्थींकडून प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यांनी बाजार समित्यांमध्ये ३२ लाख ३३ हजार ७२७ क्विंटल ४३ किलो कांदाविक्री केला होता. प्रतिक्विंटल १०० रुपये व कमाल २०० क्विंटल प्रतिलाभार्थी प्रमाणे या कांदाउत्पादकांना ३२ कोटी ३३ लाख ७२ हजार ७४३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारने प्राप्त प्रस्तावांची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांमार्फत छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रस्तावांची छाननी सुरू केली आहे. सर्वाधिक लाभार्थी राहुरी बाजार समितीमध्ये नोंदविले गेले आहेत.