शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना ३२ कोटींची लक्ष्मी पावणार

By admin | Updated: November 2, 2016 20:20 IST

दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे.

ऑनलाइन लोकमत/मिलिंदकुमार साळवे अहमदनगर, दि. 02 - दिवाळीचे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना लवकरच पुन्हा एकदा अनुदानाच्या रूपाने लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तब्बल ३२ कोटी रुपयांची लक्ष्मी जिल्ह्यातील कांदाउत्पादकांना पावणार आहे.यावर्षी (२०१६) जुलै व आॅगस्टमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली आहे. या कालावधीत राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अधिक उत्पादनामुळे कांद्याचे भाव राज्यभरातच गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. त्यानंतर राज्यभरातूनच कांदाउत्पादकांना सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी झाली. या मागणीची व शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेत राज्य सरकारने जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात बाजार समितीच्या आवारात अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फत कांदाविक्री करणाऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याची मर्यादा घालण्यात आली.त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारात विक्री केलेल्या कांदाउत्पादक शेतकऱ्यांना स्वत:च्या नावे असलेला सातबारा उतारा, कांदा विक्रीच्या हिशेब पावतीच्या छायांकित प्रती, बँक बचत खाते क्रमांक, संपूर्ण नाव व पत्त्यासह कांदा अनुदान मागणी अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी सुरुवातीस २२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदान मागणी अर्ज सादर करण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती.नगर जिल्ह्यात ३२ लाख शेतकऱ्यांना लाभया मुदतीत अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांकडे २ लाख १७ हजार ४०७ लाभार्र्थींकडून प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यांनी बाजार समित्यांमध्ये ३२ लाख ३३ हजार ७२७ क्विंटल ४३ किलो कांदाविक्री केला होता. प्रतिक्विंटल १०० रुपये व कमाल २०० क्विंटल प्रतिलाभार्थी प्रमाणे या कांदाउत्पादकांना ३२ कोटी ३३ लाख ७२ हजार ७४३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकारने प्राप्त प्रस्तावांची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांमार्फत छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रस्तावांची छाननी सुरू केली आहे. सर्वाधिक लाभार्थी राहुरी बाजार समितीमध्ये नोंदविले गेले आहेत.