वाशिम : शेतकरी अपघात विमा योजनेच्या गत पाच वर्षातील राज्यभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर ६९ टक्के लाभार्थींंचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे आणि उर्वरीत ३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी बसल्याचे स्पष्ट जाणवते. २00९ ते २0१३ या कालावधीत एकूण १५ हजार १0५ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १0३0४ प्रस्तावांना विम्याचे कवच मिळाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव निकषात बसत नसल्याच्या कारणावरून जैसे थे ठेवण्यात आले.अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी, कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने राज्यात २00५-0६ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना आणली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचे नाव आता ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे केले आहे. नाव बदलले असले तरी त्यातील गुंता मात्र कायम ठेवला असल्याचा आरोप मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्याचा भार राज्यशासन उचलत आहे. २00९ मध्ये विम्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरातून २७३९ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १७२३ प्रस्तावांना हिरवी झेंडी तर १0१६ प्रस्ताव अपात्र ठरले. २0१0 मध्ये ३0९७ प्रस्तावापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरीत १00१ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २0११ मध्ये ३२३६ पैकी २५३८ मंजूर तर ६९८ प्रस्ताव नामंजूर झाले. २0१२ मध्ये ३0८0 प्रस्ताव दाखल झाले. यापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना २0 कोटी ७९ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २0१३ मध्ये २९५३ प्रस्ताव दाखल झाले. यापैकी १८५१ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना १८ कोटी ५१ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २00९ ते २0१३ या पाच वर्षात १५ हजार १0५ प्रस्तावांपैकी १0 हजार ३0४ प्रस्ताव मंजूर झाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव अपात्र ठरले. अपात्र प्रस्तावांच्या टक्केवारीचे एकूण प्रमाण ३१.७८ येते.
३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी!
By admin | Updated: August 21, 2014 00:15 IST