शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी!

By admin | Updated: August 21, 2014 00:15 IST

शेतकरी अपघात विमा योजना

वाशिम : शेतकरी अपघात विमा योजनेच्या गत पाच वर्षातील राज्यभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर ६९ टक्के लाभार्थींंचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे आणि उर्वरीत ३१ टक्के लाभार्थींंना विमा योजनेची हुलकावणी बसल्याचे स्पष्ट जाणवते. २00९ ते २0१३ या कालावधीत एकूण १५ हजार १0५ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १0३0४ प्रस्तावांना विम्याचे कवच मिळाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव निकषात बसत नसल्याच्या कारणावरून जैसे थे ठेवण्यात आले.अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्यासाठी, कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने राज्यात २00५-0६ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना आणली. या योजनेंतर्गत एकूण १३ प्रकारच्या अपघातांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचे नाव आता ह्यकिसान जनता अपघात विमा योजनाह्ण असे केले आहे. नाव बदलले असले तरी त्यातील गुंता मात्र कायम ठेवला असल्याचा आरोप मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबियांकडून होत आहे. या विमा योजनेच्या हप्त्याचा भार राज्यशासन उचलत आहे. २00९ मध्ये विम्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरातून २७३९ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी १७२३ प्रस्तावांना हिरवी झेंडी तर १0१६ प्रस्ताव अपात्र ठरले. २0१0 मध्ये ३0९७ प्रस्तावापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरीत १00१ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २0११ मध्ये ३२३६ पैकी २५३८ मंजूर तर ६९८ प्रस्ताव नामंजूर झाले. २0१२ मध्ये ३0८0 प्रस्ताव दाखल झाले. यापैकी २0९६ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना २0 कोटी ७९ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २0१३ मध्ये २९५३ प्रस्ताव दाखल झाले. यापैकी १८५१ प्रस्ताव मंजूर होऊन लाभार्थींंना १८ कोटी ५१ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली. २00९ ते २0१३ या पाच वर्षात १५ हजार १0५ प्रस्तावांपैकी १0 हजार ३0४ प्रस्ताव मंजूर झाले तर ४ हजार ८0१ प्रस्ताव अपात्र ठरले. अपात्र प्रस्तावांच्या टक्केवारीचे एकूण प्रमाण ३१.७८ येते.