शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आजारांनी आठ महिन्यांत ३१ जणांचा मृत्यू!

By admin | Updated: November 5, 2016 03:45 IST

चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले

सुरेश लोखंडे,

ठाणे- चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले असून, यापैकी ३१ जणांचा या किरकोळ आजारांनी जीव घेतला आहे. यातील ११ जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, आरोग्य यंत्रणेला उर्वरित २० जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधता आलेले नाही. मृत्यूची सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवली महापालिकेसह मीरा-भार्इंदरमध्ये अधिक असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या निश्चित तापांच्या साथीसह अन्य तापाची २५ ठिकाणी साथ उद्भवली आहे. त्यातील ३१ जणांचा मृत्यू या आठ महिन्यांत ओढावला आहे. यातील एक मृत्यू नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काचोळे तीसगाव येथील डेंग्यूच्या साथीदरम्यान झाला आहे. मात्र त्याचा मृत्यू डेग्यूनेच झाला, हे स्पष्ट व्हायचे आहे. जिल्ह्यात मलेरियाची साथ सहा ठिकाणी उद्भलेली आहे. यामध्ये ६३ जणांना या साथीची लागण झाली असता त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डेंग्यूच्या साथीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात या २४ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर नगरपालिकांमध्ये दोन मृत्यू झाले असून, ग्रामीण व आदिवासी भागात देखील चार मृत्यूची नोंद आढळून आली आहे. >आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक १३ जाणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल मीरा-भार्इंदर महापालिकेत आठ रुग्ण दगावले आहेत. ठाण्यात दोन, भिवंडी महापालिकासह ग्रामीण भागात तीन मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये दोन मृत्यू आहेत. शहापूर, मुरबाडच्या आदिवासी व ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू या साथीच्या किरकोळ आजारांनी ओढावलेला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. या साथीच्या आजारांमध्ये झालेल्या मृत्यूची संख्या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आढळून आली आहे. यामुळे महापालिकांच्या आरोग्य यंत्रणेसह साफसपाईच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.