शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

आजारांनी आठ महिन्यांत ३१ जणांचा मृत्यू!

By admin | Updated: November 5, 2016 03:45 IST

चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले

सुरेश लोखंडे,

ठाणे- चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले असून, यापैकी ३१ जणांचा या किरकोळ आजारांनी जीव घेतला आहे. यातील ११ जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, आरोग्य यंत्रणेला उर्वरित २० जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधता आलेले नाही. मृत्यूची सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवली महापालिकेसह मीरा-भार्इंदरमध्ये अधिक असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या निश्चित तापांच्या साथीसह अन्य तापाची २५ ठिकाणी साथ उद्भवली आहे. त्यातील ३१ जणांचा मृत्यू या आठ महिन्यांत ओढावला आहे. यातील एक मृत्यू नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काचोळे तीसगाव येथील डेंग्यूच्या साथीदरम्यान झाला आहे. मात्र त्याचा मृत्यू डेग्यूनेच झाला, हे स्पष्ट व्हायचे आहे. जिल्ह्यात मलेरियाची साथ सहा ठिकाणी उद्भलेली आहे. यामध्ये ६३ जणांना या साथीची लागण झाली असता त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डेंग्यूच्या साथीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात या २४ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर नगरपालिकांमध्ये दोन मृत्यू झाले असून, ग्रामीण व आदिवासी भागात देखील चार मृत्यूची नोंद आढळून आली आहे. >आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक १३ जाणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल मीरा-भार्इंदर महापालिकेत आठ रुग्ण दगावले आहेत. ठाण्यात दोन, भिवंडी महापालिकासह ग्रामीण भागात तीन मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये दोन मृत्यू आहेत. शहापूर, मुरबाडच्या आदिवासी व ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू या साथीच्या किरकोळ आजारांनी ओढावलेला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. या साथीच्या आजारांमध्ये झालेल्या मृत्यूची संख्या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आढळून आली आहे. यामुळे महापालिकांच्या आरोग्य यंत्रणेसह साफसपाईच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.