शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

दिवसाला ३०० फाइल्स निकाली -मुख्यमंत्री

By admin | Updated: December 2, 2014 04:30 IST

दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे

डोंबिवली : दर्यावरचा कोळी आणि आगरावरचा आगरी हे महाराष्ट्राचे त्याहीपेक्षा कोकणाचे वैभव आहेत. आगरी समाजाचा पराक्रम छ. शिवाजी महाराजांच्या मावळयामध्येही आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. त्यामुळेच त्या समाजाप्रती विशेष जिव्हाळा असून त्यांना भेडसावणाऱ्या बहुतांशी अडीअडचणी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत बसून-चर्चा करुन न्यायालयीन प्रक्रिया वगळता जेवढी प्रकरणे निकालात काढता येतील, तेवढी निश्चितपणे काढीन, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डोंबिवली आगरी महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी काढले. येथील एमआडयीसी पसिरातील क्रीडा संकुलनाच्या पटांगणावर या महोत्सवाचा सोमवारी शुभारंभ झाला़ त्यावेळी उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे यांनी मांडलेल्या समस्यांना उत्तर देतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, दिवसाला ३०० फाईल निकाली लावत असून सकाळी आलेली फाईल संध्याकाळपर्यंत विधी विभागासह अन्य तांत्रिक अडचणी वगळता तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाच संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्या पद्धतीनेच जेमतेम महिनाच झाला असून काम सुरु असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरातील आगरी बांधवांच्या समस्यांसंदर्भात ते म्हणाले की, या समाजबांधवांना एक महाविद्यालय काढायचे आहे, त्यासाठी तातडीने विचार केला जाईल व तसे कळविले जाईल, तसेच आगरी समाज भवनाची जी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे ती न्याय प्रविष्ट असल्याने जो काही निर्णय येईल तोपर्यंत त्या जागेवर कोणालाही दावा करु देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)