शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षभरात ३00 कोटींचा अपहार

By admin | Updated: August 12, 2015 03:33 IST

एसटी महामंडळाला सध्या अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतानाही एसटीच्या वाहकांकडूनच एसटीला चुना लावला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई : एसटी महामंडळाला सध्या अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतानाही एसटीच्या वाहकांकडूनच एसटीला चुना लावला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिकिटांमध्ये वाहकांकडून अपहार करण्यात येत असून, वर्षाला ३00 कोटींचा फटका बसत असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.सुरक्षा व दक्षता विभागाने १ एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या कालावधीत वाहकांची ३ हजार ६२३ अपहाराची प्रकरणे उघडकीस आणली असून, यामध्ये सर्वाधिक प्रकरणे औरंगाबाद, पुणे आणि मुंबई प्रादेशिक विभागातील आहेत. औरंगाबादमध्ये ७२८, पुण्यात ७५३ तर मुंबईत ५९४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानंतर नागपूर, नाशिक, अमरावतीचा समावेश आहे. यामुळे महामंडळाला काही लाखांचा फटकाही बसला आहे. ही प्रकरणे उघडकीस आली तरी ती फारच कमी असून, त्याहीपेक्षा अधिक प्रकरणे असल्याची दाट शक्यता वरिष्ठ अधिकारी सांगतात. परंतु कमी मनुष्यबळामुळे पाहिजे तशी कारवाई होत नाही आणि खूपच कमी प्रमाणात प्रकरणे उघडकीस येतात. एसटी महामंडळाकडून याबाबत अभ्यास करण्यात आला असून, तिकिटांचा मोठा अपहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा फटका बसू नये आणि अफरातफरीला आळा बसावा यासाठी एसटीकडून प्रयत्नही सुरू आहेत. तिकिटांच्या अपहार प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाते. काही प्रकरणे ही न्यायालयात जातात आणि न्यायालयाच्या निर्णयानुसारही कारवाई होते. अपहार प्रकरणांना आळा बसावा यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. - संजय खंदारे, (एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक)अपहार कसा होतो ?एसटीकडे तिकिटांचे पैसे जमा न करणे, पैसे कमी जमा करणे, तिकिटांचे उर्वरित पैसे न देणे, कमी अंतरावचे तिकीट पाहिजे असतानाही जादा अंतरावरचे तिकीट देऊन पैसे लाटणे अशा अनेक कारणांमुळे पैसे कमी जमा होत असल्याचे सांगितले.