शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल. तसे न करता शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा यासाठी आपल्या सरकारने कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की, कर्जमाफी दिली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत राहील. तो कर्जातच जन्मेल, जगेल आणि मरेलही. आपल्या सरकारला तसे होऊ द्यायचे नाही. त्यासाठीच कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यावर आमचा भर आहे. ते म्हणाले की, राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची मुदत टळून गेली आहे. त्यांना कर्जमाफी द्यायची तर ३० हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारचा वार्षिक खर्च २ लाख ५७ हजार कोटी रुपये आहे. केंद्र सरकारकडून राज्याला विविध योजनांसाठी ३४ हजार ४२१ कोटी रुपये लागतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना वर्षाकाठी १० हजार कोटी रुपये राज्य सरकार देते. सरकारच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चापैकी १९ हजार ४३४ कोटी रुपये कृषी व संलग्न क्षेत्रात आम्ही खर्च करीत आहोत. याशिवाय, पीक विम्यासाठी २ हजार कोटी रुपये दिले, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ८ हजार कोटी रुपये टाकले, कृषी समृद्धीसाठी १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.