शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल. तसे न करता शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा यासाठी आपल्या सरकारने कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की, कर्जमाफी दिली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत राहील. तो कर्जातच जन्मेल, जगेल आणि मरेलही. आपल्या सरकारला तसे होऊ द्यायचे नाही. त्यासाठीच कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यावर आमचा भर आहे. ते म्हणाले की, राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची मुदत टळून गेली आहे. त्यांना कर्जमाफी द्यायची तर ३० हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारचा वार्षिक खर्च २ लाख ५७ हजार कोटी रुपये आहे. केंद्र सरकारकडून राज्याला विविध योजनांसाठी ३४ हजार ४२१ कोटी रुपये लागतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना वर्षाकाठी १० हजार कोटी रुपये राज्य सरकार देते. सरकारच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चापैकी १९ हजार ४३४ कोटी रुपये कृषी व संलग्न क्षेत्रात आम्ही खर्च करीत आहोत. याशिवाय, पीक विम्यासाठी २ हजार कोटी रुपये दिले, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ८ हजार कोटी रुपये टाकले, कृषी समृद्धीसाठी १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.