शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा फायदा बँकांना होत राहील आणि शेतकरी मात्र वर्षानुवर्षे कर्जातच जन्मेल आणि कर्जातच मरेल. तसे न करता शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा यासाठी आपल्या सरकारने कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की, कर्जमाफी दिली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत राहील. तो कर्जातच जन्मेल, जगेल आणि मरेलही. आपल्या सरकारला तसे होऊ द्यायचे नाही. त्यासाठीच कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यावर आमचा भर आहे. ते म्हणाले की, राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची मुदत टळून गेली आहे. त्यांना कर्जमाफी द्यायची तर ३० हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारचा वार्षिक खर्च २ लाख ५७ हजार कोटी रुपये आहे. केंद्र सरकारकडून राज्याला विविध योजनांसाठी ३४ हजार ४२१ कोटी रुपये लागतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना वर्षाकाठी १० हजार कोटी रुपये राज्य सरकार देते. सरकारच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चापैकी १९ हजार ४३४ कोटी रुपये कृषी व संलग्न क्षेत्रात आम्ही खर्च करीत आहोत. याशिवाय, पीक विम्यासाठी २ हजार कोटी रुपये दिले, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ८ हजार कोटी रुपये टाकले, कृषी समृद्धीसाठी १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.