शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात ३० कारखान्यांचे गाळप सुरू

By admin | Updated: November 3, 2015 03:03 IST

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.

- अरुण बारसकर,  सोलापूरराज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ऊस वाढीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यामुळे यंदा साखर गाळप हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील १७० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मागितली होती. या सर्व कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्यास एक महिन्याची मुदत देऊन गाळप परवाने दिले आहेत. काही साखर कारखान्यांनी एक आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, परंतु शासनाने १५ आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली. त्यानंतर साखर कारखान्याच्या हंगामाला सुरुवात झाली. सोमवारी साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते ३० साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील चार, सांगली, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे ६ लाख ६ हजार ८९३ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील साखर कारखान्यांचे गाळप दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य कारखानेही दिवाळीनंतर सुरू होतील असे सांगण्यात आले.कारखानदारांची उसासाठी स्पर्धादुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने साखर हंगामावर परिणाम होणार असल्याने साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यास घाई सुरू केली आहे. मागील वर्षीच्या गाळपाला आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिलेल्या काही कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी धजणार नाहीत. वाढलेले साखर कारखाने व ऊस क्षेत्र कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्याची घाई केली आहे.