शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राज्यात ३० कारखान्यांचे गाळप सुरू

By admin | Updated: November 3, 2015 03:03 IST

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.

- अरुण बारसकर,  सोलापूरराज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला दिवाळीनंतच वेग येणार असून सध्या ३० कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा समावेश आहे.मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ऊस वाढीवर कमालीचा परिणाम झाला आहे. यामुळे यंदा साखर गाळप हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील १७० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मागितली होती. या सर्व कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्यास एक महिन्याची मुदत देऊन गाळप परवाने दिले आहेत. काही साखर कारखान्यांनी एक आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, परंतु शासनाने १५ आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली. त्यानंतर साखर कारखान्याच्या हंगामाला सुरुवात झाली. सोमवारी साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते ३० साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील चार, सांगली, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे ६ लाख ६ हजार ८९३ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील साखर कारखान्यांचे गाळप दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य कारखानेही दिवाळीनंतर सुरू होतील असे सांगण्यात आले.कारखानदारांची उसासाठी स्पर्धादुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने साखर हंगामावर परिणाम होणार असल्याने साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यास घाई सुरू केली आहे. मागील वर्षीच्या गाळपाला आलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिलेल्या काही कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी धजणार नाहीत. वाढलेले साखर कारखाने व ऊस क्षेत्र कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्याची घाई केली आहे.