शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

भेंडी उत्पादकांच्या ३० कंपन्या

By admin | Updated: April 4, 2016 03:03 IST

उत्तम दर्जाच्या भेंडीचे उत्पादन करणाराजिल्हा म्हणून नावारूपाला येत असतानाच आता ठाणे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेउत्तम दर्जाच्या भेंडीचे उत्पादन करणाराजिल्हा म्हणून नावारूपाला येत असतानाच आता ठाणे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या ३०कंपन्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत ७४० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दलालमुक्त आणि आडतेमुक्त होण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन उत्पादन परदेशात पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांतील हवामान व माती भेंडीसाठी उत्तम आहे. याशिवाय, भेंडीला देशातील सर्वच राज्यांतून मागणी आहे, पण जागतिक पातळीवरील आखातासह अन्यही देशांत शहापूर व मुरबाडमधील भेंडीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. यामुळे या भेंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात ३० कंपन्या उभ्या करण्यात येणार आहेत. यातील सुमारे आठ कंपन्यांची नोंदणीही झाली असल्याचे जंगटे यांनी सांगितले.शहापूर व मुरबाडमध्ये एक हजार १०० एकरांवर भेंडीचे पीक घेतले जाते. त्यातील बहुतांशी भेंडी आखाती देशांसह युरोपात निर्यात केली जाते. भेंडी निर्यातीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी या उत्पादक शेतकऱ्यांना कंपन्यांमध्ये विभागले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मँगोनेट, व्हेजनेट व फायटोसॅनिटरी अ‍ॅथॉरिटीच्या बळकटीकरणाद्वारे निर्यातीस प्रोत्साहन मिळत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ही योजना लागू झाली आहे. त्याद्वारे भेंडीची निर्यात करण्यासाठी निवड झाली आहे. या ३० कंपन्यांद्वारे २३० हेक्टर शेतजमिनीवर भेंडीचे दर्जेदार पीक घेण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. शेती, कुशल मजूर, मुबलक पाणी आणि पोषक हवामानाची नैसर्गिक देणगी या दोन तालुक्यांना मिळाली आहे. यासाठी बी-बियाणे, कीटकनाशक, कीड व रोगमुक्त भेंडीच्या उत्पादनाची हमी असल्यामुळेच कृषीविभाग या शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमध्ये समाविष्ट करीत आहे. कमी उत्पादनात त्यांना जास्त पैसा मिळणार आहे.