शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

३ हजार कोटींच्या विहिरी

By admin | Updated: July 18, 2014 01:02 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन

मनरेगा : विदर्भात ३५ टक्के कामेनागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (मनरेगा) एक लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्च होत असून या माध्यमातून एकूण तीन हजार कोटींची कामे होणार आहेत.एक लाख विहिरींपैकी ३० हजार विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ७० हजार विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत, असे रोहोयो मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.मनरेगाच्या नवीन आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी पुण्यातील १६ मुख्यालये नागपुरात सुरू करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले. वन , खाण आणि इतर काही मुख्यालयांचा अपवाद सोडला तर बरीचशी कार्यालये अद्याप येथे आली नाहीत. रोहयो खात्याचा मंत्री झाल्यानंतर मनरेगाचे मुख्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव जेव्हा पुढे आला तेंव्हाही पुण्याचेच नाव होते. मात्र ते विदर्भात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश आले. विदर्भात सध्या मनरेगाची ३५ टक्के कामे सुरू आहेत. मुख्यालय नागपूरमध्ये सुरू करण्याचा हा फायदा आहे.तीन वर्षापूर्वी या योजनेचे बजेट ३४० कोटी रुपये होते आता ते २ हजार कोटींवर गेले आहे. मनरेगाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त कामे सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळाच्या काळातही मागेल त्याला काम देण्याची शासनाची तयारी आहे. यावर्षासाठी १२०० कोटींच्या कामांचे उदिष्ट निश्चित करण्यात आले असून पुढच्या वर्षासाठी १५०० कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. २८ हजार ग्रामपंचायतीत रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे, असे राऊत म्हणाले. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उपग्रह प्रणालीवर आधारित यंत्रणा वापरण्यात येत आहे. मजुरांना लवकरात लवकर मजुरी मिळावी यासाठी नवीन यंत्रणा अस्तित्वात आणण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.राज्यस्तरीय कार्यशाळादरम्यान दुपारी राज्यभरातून आलेले ग्रामरोजगार सेवक आणि इतर अधिकाऱ्यांची देशपांडे सभागृहात कार्यशाळा झाली. यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. ग्राम रोजगार सेवक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले. नरेगाची कामे विखुरलेली असल्याने ती दिसत नाही मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या कामातून गुंतवणूक झाली आहे, असे प्रधान सचिव व्ही.गिरीराज म्हणाले. (प्रतिनिधी)नवीन आयुक्तालय चकाचकमनरेगा नवीन आयुक्तालयाची रचना एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या कार्यालयाप्रमाणे करण्यात आली आहे. प्रशासकीय भवनाच्या (क्रं २) पहिल्या माळ्यावर असलेल्या या कार्यालयाचे उद््घाटन गुरुवारी रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रधान सचिव व्ही गिरीराज,कार्यशाळेला विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन, नासुप्रचे सभापती डॉ. प्रवीण दराडे, रोहोयोच्या उपसचिव आर. विमला यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यालयाच्या रचनेवर एकूण दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सध्या विभागीय आयुक्त कार्यालयात हे आयुक्तालयाचे कामकाज सुरू होते.