शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांतील २८,५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 05:42 IST

चारा छावण्यांमध्ये तब्बल ६ लाख जनावरे : महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २५ टक्के पाणी शिल्लक

- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तब्बल २८ हजार ५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ असून, ९ जिल्ह्यांत सुरू झालेल्या ९४६ चारा छावण्यांत सुरू तब्बल ६ लाख जनावरे आली आहेत, तसेच ९,६६० गावे, वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी असताना ही भीषण स्थिती आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर स्थलांतराची वेळ येईल, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय नेते, मंत्री मात्र निवडणूक प्रचारात मग्न आहेत.

आचारसंहितेमुळे बोलणे नाही, पण परिस्थिती भीषण आहे, असे सांगून अधिकारी म्हणाला की, ३० आॅक्टोबर रोजी सरकारने १७,९८५ गावे दुष्काळग्रस्त घोषित केली. त्यात सतत वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारी रोजी ४,५१८ गावे त्यात समाविष्ट केली. पाण्याची, चाऱ्याची टंचाई असताना अन्नधान्याची जुळवाजुळव करण्याचे नियोजन कोलमडले आहे. तीन महिन्यांचा साठा करून ठेवावा, असा नियम असताना एफसीएकडून लागेल तसा माल मागवून दिवस ढकलला जात आहे. धान्याची गोदामे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असून, आचारसंहितेमुळे त्यावर त्यांचेच नियंत्रण आहे. अहमनदगर, सातारा, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या नऊ जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाण्याचा दुष्काळ मात्र सर्वत्र आहे. काही भागांत आताच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे.

या जिल्ह्यांत पशुसंवर्धन व महसूल विभाग, तसेच स्वयंसेवी संस्थांकडून ९४६ चारा छावण्या चालविल्या जात आहेत. यात सध्या ६,०१,४८१ जनावरे आहेत. चारा छावण्यांची मागणी वाढूनही त्यांना लवकर मंजुरी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बीड जिल्ह्यात फारच वाईट स्थिती असून, तिथे ३,४२,७५७ जनावरे छावण्यांमध्ये आहेत.कोकणातील पाच जिल्ह्यांत ४२, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत ६७५, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत ५१३, औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत २०६३, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १२६ टँकर चालू आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मात्र सध्या एकही टँकर नाही.केंद्राकडून पूर्ण मदत नाहीचराज्याच्या २८ हजार गावांमधील सुमारे ८२,२७,१६६ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात असून, ८५ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्र दुष्काळाखाली आहे. सरकारने ३१ मार्चपर्यंत ६७,३०,८६५ शेतकºयांच्या बँक खात्यात ४,४१,२५७ लाख रुपये निधी जमा केला आहे. केंद्राने राज्याला ७,२१४ कोटींची मदत जाहीर केली होती. त्यापैकी ४,७१४ कोटी मिळाले असून, ३,२४८ कोटी रुपये मिळणे बाकी आहे.