मुंबई : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईत २0१२ ते २0१६ या पाच वर्षांत विविध अपघातांत २ हजार ८0२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहन सावकाश आणि नियमांचे पालन करून चालवा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करू नका, असे आवाहन करतानाच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. परंतु त्याकडे वाहनचालक दुर्लक्षच करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत २ हजार ६८४ अपघात झाले आहेत. यामध्ये २ हजार ८0२ वाहनचालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. २0१५मध्ये सर्वाधिक ६११ जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाण जरी जास्त असले तरी गंभीर जखमींचे प्रमाण हे सर्वांत जास्त आहे. जवळपास ११ हजार २५७ वाहनचालक हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)>स्पीड कॅमेरेवाहनचालक हे वेगमर्यादेपेक्षा अतिशय वेगाने वाहन चालवताना आढळतात आणि त्यामुळे अपघातही होतात. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता स्पीड कॅमेरे वांद्रे वरळी सी लिंक, ईस्टर्न फ्री-वेवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाची माहिती मिळताच वाहनावर कारवाई करणे सोपे जाते. >मनुष्यबळ कमीमुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे एकूण २१७ पोलीस अधिकारी, २७७१ पोलीस अंमलदार असे एकूण २९८८ मनुष्यबळ आहे. वाहनांची संख्या पाहता, हे मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे आणखी मनुष्यबळ मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत. >अपघातांची माहितीवर्षमृत्यूगंभीर किरकोळकमी प्रमाणात जखमीजखमीजखमी२0१२४८८२,१४१२,४0२२0,१0७२0१३५९५२,१११२,१२८२३,५९४२0१४५९८१,९८९१,९१५२२,५९९२0१५६११२,४८२१,५४७२३,४६८२0१६५१0२,५३४९९८३,३४९
पाच वर्षांत २,८0२ मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:03 IST