शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

२७६ बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध

By admin | Updated: July 26, 2016 21:40 IST

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे

ऑनलाइन लोकमतलातूर : एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी २०१० नंतरच्या मिसिंगच्या तक्रारींचा फेरविचार करुन, बेपत्ता मुलांचा शोध नव्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७६ मुले-मुली बेपत्ता असून, ती सर्व जाती-धर्मातील आहेत.

लातूर जिल्ह्यातून २०१३ ते जून २०१६ अखेरपर्यंत २ हजार ५४ मुले-मुली हरवल्याची तक्रार त्या-त्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील २७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये १५३ मुलांचा समावेश असून, या बेपत्ता मुलांचा लातूर पोलिस पुन्हा नव्याने शोध घेत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दितील ग्रामीण आणि शहरी भागातून मुले-मुली कुटुुंबियांना वेगवेगळे कारण सांगत घराबाहेर पडली आहेत. यातील काही मुले-मुली हे कालांतराने घरी परतली आहेत.

यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांनी या मुलांचा शोध लावला आहे. मात्र सन २०१३ पासून गायब असलेल्या एकूण २७६ मुला-मुलींचा शोध लावण्यात कुटुंबिय आणि पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. हे मुले-मुली नेमके कोठे आहेत? याचा साधा मागमूसही आतापर्यंत पोलिसांना लागला नाही. रविवारी लातुरात आलेले एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा लातूर पोलिस पुनर्विचार करत आहे. पुन्हा त्या बेपत्ता मुला-मुलींचा शोध नव्याने सुरु केला आहे.

यासाठी खास मोहिम राबविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बेपत्ता १०० मुलांपैकी लातूर जिल्ह्यातील किती मुलांचा यात समावेश आहे. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)