शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

२७६ बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध

By admin | Updated: July 26, 2016 21:40 IST

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे

ऑनलाइन लोकमतलातूर : एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी २०१० नंतरच्या मिसिंगच्या तक्रारींचा फेरविचार करुन, बेपत्ता मुलांचा शोध नव्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७६ मुले-मुली बेपत्ता असून, ती सर्व जाती-धर्मातील आहेत.

लातूर जिल्ह्यातून २०१३ ते जून २०१६ अखेरपर्यंत २ हजार ५४ मुले-मुली हरवल्याची तक्रार त्या-त्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील २७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये १५३ मुलांचा समावेश असून, या बेपत्ता मुलांचा लातूर पोलिस पुन्हा नव्याने शोध घेत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दितील ग्रामीण आणि शहरी भागातून मुले-मुली कुटुुंबियांना वेगवेगळे कारण सांगत घराबाहेर पडली आहेत. यातील काही मुले-मुली हे कालांतराने घरी परतली आहेत.

यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांनी या मुलांचा शोध लावला आहे. मात्र सन २०१३ पासून गायब असलेल्या एकूण २७६ मुला-मुलींचा शोध लावण्यात कुटुंबिय आणि पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. हे मुले-मुली नेमके कोठे आहेत? याचा साधा मागमूसही आतापर्यंत पोलिसांना लागला नाही. रविवारी लातुरात आलेले एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा लातूर पोलिस पुनर्विचार करत आहे. पुन्हा त्या बेपत्ता मुला-मुलींचा शोध नव्याने सुरु केला आहे.

यासाठी खास मोहिम राबविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बेपत्ता १०० मुलांपैकी लातूर जिल्ह्यातील किती मुलांचा यात समावेश आहे. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)