शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

२७६ बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध

By admin | Updated: July 26, 2016 21:40 IST

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे

ऑनलाइन लोकमतलातूर : एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी २०१० नंतरच्या मिसिंगच्या तक्रारींचा फेरविचार करुन, बेपत्ता मुलांचा शोध नव्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७६ मुले-मुली बेपत्ता असून, ती सर्व जाती-धर्मातील आहेत.

लातूर जिल्ह्यातून २०१३ ते जून २०१६ अखेरपर्यंत २ हजार ५४ मुले-मुली हरवल्याची तक्रार त्या-त्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील २७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये १५३ मुलांचा समावेश असून, या बेपत्ता मुलांचा लातूर पोलिस पुन्हा नव्याने शोध घेत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दितील ग्रामीण आणि शहरी भागातून मुले-मुली कुटुुंबियांना वेगवेगळे कारण सांगत घराबाहेर पडली आहेत. यातील काही मुले-मुली हे कालांतराने घरी परतली आहेत.

यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांनी या मुलांचा शोध लावला आहे. मात्र सन २०१३ पासून गायब असलेल्या एकूण २७६ मुला-मुलींचा शोध लावण्यात कुटुंबिय आणि पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. हे मुले-मुली नेमके कोठे आहेत? याचा साधा मागमूसही आतापर्यंत पोलिसांना लागला नाही. रविवारी लातुरात आलेले एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा लातूर पोलिस पुनर्विचार करत आहे. पुन्हा त्या बेपत्ता मुला-मुलींचा शोध नव्याने सुरु केला आहे.

यासाठी खास मोहिम राबविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बेपत्ता १०० मुलांपैकी लातूर जिल्ह्यातील किती मुलांचा यात समावेश आहे. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)