शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

२७६ बेपत्ता मुलांचा पोलिसांकडून शोध

By admin | Updated: July 26, 2016 21:40 IST

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे

ऑनलाइन लोकमतलातूर : एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मराठवाड्यातील १०० मुले गायब असल्याचे विधान लातुरात नुकतेच केले. या मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लातूर पोलिसांनी २०१० नंतरच्या मिसिंगच्या तक्रारींचा फेरविचार करुन, बेपत्ता मुलांचा शोध नव्याने हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७६ मुले-मुली बेपत्ता असून, ती सर्व जाती-धर्मातील आहेत.

लातूर जिल्ह्यातून २०१३ ते जून २०१६ अखेरपर्यंत २ हजार ५४ मुले-मुली हरवल्याची तक्रार त्या-त्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील २७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यामध्ये १५३ मुलांचा समावेश असून, या बेपत्ता मुलांचा लातूर पोलिस पुन्हा नव्याने शोध घेत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दितील ग्रामीण आणि शहरी भागातून मुले-मुली कुटुुंबियांना वेगवेगळे कारण सांगत घराबाहेर पडली आहेत. यातील काही मुले-मुली हे कालांतराने घरी परतली आहेत.

यासाठी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘मुस्कान आॅपरेशन’च्या माध्यमातून पोलिसांनी या मुलांचा शोध लावला आहे. मात्र सन २०१३ पासून गायब असलेल्या एकूण २७६ मुला-मुलींचा शोध लावण्यात कुटुंबिय आणि पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. हे मुले-मुली नेमके कोठे आहेत? याचा साधा मागमूसही आतापर्यंत पोलिसांना लागला नाही. रविवारी लातुरात आलेले एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेचा लातूर पोलिस पुनर्विचार करत आहे. पुन्हा त्या बेपत्ता मुला-मुलींचा शोध नव्याने सुरु केला आहे.

यासाठी खास मोहिम राबविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरु करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बेपत्ता १०० मुलांपैकी लातूर जिल्ह्यातील किती मुलांचा यात समावेश आहे. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)