शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

टोलबंदीसाठी गरज २७५० कोटींची

By admin | Updated: June 28, 2016 05:32 IST

मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला

मुंबई : मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत असलेल्या महापालिका निवडणुकीवर नजर ठेवून राज्यातील भाजपा सरकार टोलमुक्तीचा निर्णय घेऊ शकते. शिवसेनेला मात देण्याची एक संधीही यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. या पाच नाक्यांवरील टोलबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने टोलमुक्तीचा हिशेब सरकारला सादर केला आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन चारचाकी वाहनांना टोलमुक्ती दिली जाऊ शकते. हे टोलनाके बंदच करायचे असतील तर एकमुस्त २१०० कोटी रुपयांचा बोजा शासनाला सहन करावा लागेल, असे समितीने स्पष्ट केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तथापि, सर्व प्रकारच्या वाहनांना टोलमुक्ती दिली जाणार नाही आणि देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. राज्य आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीत कराव्या लागलेल्या उपाययोजनांवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्याच्या इतर भागात दिलेली टोलमुक्ती आणि एलबीटी माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक गणित आणखीच बिघडले आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायद्याचे गणित मांडताना टोलमुक्ती दिली पाहिजे, असा विचारदेखील आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की मुंबईच्या टोलमुक्तीबाबत सरकार सकारात्मक आहे पण प्रश्न पैशांचा आहे. त्यामुळे वित्त विभागाशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन टोलमुक्ती देता येणे शक्य आहे.