शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

टोलबंदीसाठी गरज २७५० कोटींची

By admin | Updated: June 28, 2016 05:32 IST

मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला

मुंबई : मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत असलेल्या महापालिका निवडणुकीवर नजर ठेवून राज्यातील भाजपा सरकार टोलमुक्तीचा निर्णय घेऊ शकते. शिवसेनेला मात देण्याची एक संधीही यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. या पाच नाक्यांवरील टोलबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने टोलमुक्तीचा हिशेब सरकारला सादर केला आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन चारचाकी वाहनांना टोलमुक्ती दिली जाऊ शकते. हे टोलनाके बंदच करायचे असतील तर एकमुस्त २१०० कोटी रुपयांचा बोजा शासनाला सहन करावा लागेल, असे समितीने स्पष्ट केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तथापि, सर्व प्रकारच्या वाहनांना टोलमुक्ती दिली जाणार नाही आणि देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. राज्य आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीत कराव्या लागलेल्या उपाययोजनांवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्याच्या इतर भागात दिलेली टोलमुक्ती आणि एलबीटी माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक गणित आणखीच बिघडले आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायद्याचे गणित मांडताना टोलमुक्ती दिली पाहिजे, असा विचारदेखील आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की मुंबईच्या टोलमुक्तीबाबत सरकार सकारात्मक आहे पण प्रश्न पैशांचा आहे. त्यामुळे वित्त विभागाशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन टोलमुक्ती देता येणे शक्य आहे.