शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
3
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
4
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
5
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वायपेयी? शहर सोडायचा आला विचार
6
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
7
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
8
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
9
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
10
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
11
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
12
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
13
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
14
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
15
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
16
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
17
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
18
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
19
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
20
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

२७ गावांचा नवा वाद

By admin | Updated: September 10, 2015 04:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार

- सरकार व निवडणूक आयोगात संघर्ष

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यात संघर्षाची ठिणगी टाकणारा ठरणार आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार महापालिका निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाने सरकारच्या निदर्शनास आणली आहे. मात्र प्रशासक नेमून निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याच्या पवित्र्यात राज्य सरकार असल्याचे समजते.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीलगतच्या २७ गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला होता. मात्र या गावांचा समावेश केल्याचा राजकीय लाभ शिवसेनेला होईल, ही बाब कालांतराने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी निदर्शनास आणल्यामुळे दोन दिवसांपूर्वी ही गावे वगळण्याचा निर्णय नगरविकासने काढला होता. महापालिकेची मुदत ११ नोव्हेंबर २०१५ रोजी संपत आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढे ढकलता येत नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर एस. सहारिया यांनी सरकारच्या निदर्शनास आणली आहे. सरकारने गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयापासून घूमजाव केल्यावर पुन्हा हरकती व सूचना मागवून त्याची सुनावणी करणे यासारख्या प्रक्रिया करण्यास पुरेसा कालावधी नसल्याने सरकारला आयोगाचे म्हणणे स्वीकारणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गावे समाविष्ट करून वगळण्याची तांत्रिक चूक भाजपाला राजकीयदृष्ट्या महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (विशेष प्रतिनिधी)राज्यघटनेत सहा महिन्यांकरिता प्रशासक नेमण्याची तरतूद असून, त्याची अंमलबजावणी सरकार करू शकते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा आग्रह कायम ठेवलाच तर २७ गावांसह निवडणूक होईल व त्यानंतर पुन्हा या २७ गावांच्या नगरपालिकेकरिता निवडणूक होऊ शकते, असे सरकारमधील उच्चपदस्थांनी सांगितले.