शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा नवा वाद

By admin | Updated: September 10, 2015 04:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार

- सरकार व निवडणूक आयोगात संघर्ष

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी समाविष्ट केलेली २७ गावे राजकीय फायद्याकरिता वगळण्याचा दोन दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय राज्यातील भाजपाप्रणीत सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यात संघर्षाची ठिणगी टाकणारा ठरणार आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार महापालिका निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाने सरकारच्या निदर्शनास आणली आहे. मात्र प्रशासक नेमून निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याच्या पवित्र्यात राज्य सरकार असल्याचे समजते.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीलगतच्या २७ गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला होता. मात्र या गावांचा समावेश केल्याचा राजकीय लाभ शिवसेनेला होईल, ही बाब कालांतराने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी निदर्शनास आणल्यामुळे दोन दिवसांपूर्वी ही गावे वगळण्याचा निर्णय नगरविकासने काढला होता. महापालिकेची मुदत ११ नोव्हेंबर २०१५ रोजी संपत आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पुढे ढकलता येत नाही, ही बाब राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर एस. सहारिया यांनी सरकारच्या निदर्शनास आणली आहे. सरकारने गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयापासून घूमजाव केल्यावर पुन्हा हरकती व सूचना मागवून त्याची सुनावणी करणे यासारख्या प्रक्रिया करण्यास पुरेसा कालावधी नसल्याने सरकारला आयोगाचे म्हणणे स्वीकारणे अपरिहार्य आहे. त्यामुळे गावे समाविष्ट करून वगळण्याची तांत्रिक चूक भाजपाला राजकीयदृष्ट्या महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (विशेष प्रतिनिधी)राज्यघटनेत सहा महिन्यांकरिता प्रशासक नेमण्याची तरतूद असून, त्याची अंमलबजावणी सरकार करू शकते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा आग्रह कायम ठेवलाच तर २७ गावांसह निवडणूक होईल व त्यानंतर पुन्हा या २७ गावांच्या नगरपालिकेकरिता निवडणूक होऊ शकते, असे सरकारमधील उच्चपदस्थांनी सांगितले.