शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

२७ गावांतील शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: June 9, 2017 03:08 IST

राज्य सरकारने २७ गावे केडीएमसीत समाविष्ट करून तेथील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य सरकारने २७ गावे केडीएमसीत समाविष्ट करून तेथील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गावे समाविष्ट झाल्यापासून शेतकऱ्यांना सरकारकडून तीन वर्षांपासून शेतकी अवजारे, बी-बियाणे दिलेले नाही. त्याकडे या गावातील शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने २००२ मध्ये केडीएमसीतून २७ गावे वगळली होती. त्यानंतर, ही गावे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गेली. या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या गावांचे नियोजन प्राधिकरण एमएमआरडीएकडे २००६ मध्ये देण्यात आले. त्यामुळे गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले. मात्र, महसुली कारभार कल्याण तालुक्याकडे होते. कल्याण तहसील व पंचायत समितीकडे ही गावे होती. या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी सर्व पक्षांच्या संघर्ष समितीने केली. राज्यातील भाजपा-शिवसेनेच्या सरकारने समिती व ग्रामस्थांचा विरोध न जुमानता १ जून २०१५ ला गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना महसूल विभागापासून तोडल्याने त्यांना पावसाळ्याच्या तोंडावरच जून २०१५ मध्ये बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे दिली नाही. २०१६ व आता २०१७ मध्येही त्यांना हे साहित्य मिळालेले नाही. सरकारने गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करून तेथील शेतकरी संपूर्णपणे शहरी झाल्याची धारणा मनोमन केली आहे. सरकारने २७ गावांतील १० गावांमध्ये सप्टेंबर २०१५ मध्ये कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली आहे. या गावांतील एक हजार ८९ हेक्टर जमिनीवर एक हजार ८९ कोटी रुपये खर्चून ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. २७ गावांत हजारो हेक्टर शेतजमीन आहे. तेथे मुख्यत: भाताचे पीक तसेच वांगी, भेंडी, तूर, गवार, कारली, टरबूज, कलिंगड ही पिके घेतली जातात. या शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे यांची आवश्यकता लागते. मात्र, सरकारने तीन वर्षांपासून त्या पुरवलेल्या नाहीत. त्यामुळे शेती न करता आत्महत्या करावी का, असा सवाल येथील शेतकरी करत आहे. पॉली हाउस, शेत नांगरणीचे यंत्र खरेदीसाठी जवळपास १० लाखांपर्यंत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केले जाते. त्यासाठी ३० ते ३५ टक्के सबसिडी दिली जाते. ही सुविधाही शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून पुरवली नाही. >त्यांना सुविधा, आम्हाला का नाहीत?२७ गावे परिसरात अनेक मोठ्या बिल्डरांनी गृहप्रकल्प उभारण्यासाठी जागा घेतल्या आहेत.बिल्डरांना २७ गावे आंदण देऊन तेथील शेतकरी उद्ध्वस्थ करण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप संघर्ष समितीचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ठाणे महापालिकेतून वगळलेल्या २२ गावांना महसुली कामासाठी कल्याण तालुक्यास जोडले आहे. महसूल विभागाकडून त्यांना सेवासुविधा पुरवल्या जातात. मात्र, २७ गावांतील शेतकऱ्यांचा महसूल विभागच पुरता बंद केला आहे. >शेतकऱ्यांची कर्जमाफीची बॅनरबाजी भाजपा सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचे बॅनर कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहरात आणि २७ गावांत झळकले आहेत. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. ३१ आॅक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. असे असताना डोंबिवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांना कर्जमाफी लागू झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी उतावळेपणाने कर्जमाफीची बॅनरबाजी करून सवंग प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी केला. यापूर्वी डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्रीपद दिल्यावर त्यांचे खाते जाहीर होण्यापूर्वीच त्यांना कोणते खाते मिळाले, याचा उल्लेख करणारे बॅनर शहरात झळकले होते. त्याची पुनरावृत्ती कर्जमाफीबाबत झाली आहे. एकीकडे २७ गावांतील महसूल विभाग बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे आणि दुसरीकडे कर्जमाफी होण्यापूर्वीच बॅनरबाजी करायची, हा प्रघात थापाड्या भाजपा सरकारने पाडला आहे, असे केणे यांनी सांगितले.