शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

२६ एप्रिल रोजी एसटीचे रजा आंदोलन

By admin | Updated: April 18, 2016 02:00 IST

कामगार करारातून १२ कलमे वगळू नयेत. त्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत २६ एप्रिल रोजी एक दिवसीय रजा आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने

मुंबई : कामगार करारातून १२ कलमे वगळू नयेत. त्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत २६ एप्रिल रोजी एक दिवसीय रजा आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातवा वेतन आयोग लागू करावा, त्यास विलंब होत असल्यास २५ टक्के अंतरिम वाढ देण्यात यावी अशा प्रमुख मागण्याही संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या १ एप्रिल २0१६ पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीच्या मागण्यांचा मसुदा १ जानेवारी २0१६ रोजी एसटी प्रशासनाला सादर केला. मात्र हा मसुदा सादर करूनही एसटी प्रशासनाने कामगार संघटनेसोबत वाटाघाटी सुरू केल्या नाहीत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी थेट श्रमानुसार वेतन देण्याचा सांगत वेतन सुधारणा समिती गठित केली. अशी समिती गठीत न करता पूर्वी मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत बैठक होत होती. परंतु त्याला आता फाटाच देण्यात आल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कामगार करारातून १२ कलमे परिवहन मंत्र्यांकडून वगळण्यात आली आहेत. तशी घोषणाच त्यांनी विधानसभेत केली. परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयावर कामगार संघटनेने नाराजीही व्यक्त केली. यात स्वेच्छकाला १२ वर्षांनंतर साहाय्यकाची बढती मिळणे, एसटीची महिला कर्मचारी सात महिन्यांची गर्भवती असल्यास तिला कार्यालयात काम देणे, एसटी बसची धाव वेळ ही संघटनेच्या प्रतिनिधींकडूनच तपासणे अशा कलमांंचा समावेश आहे. याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण म्हणाले की, कलमे वगळू नयेत आणि अन्य मागण्यांसाठी आम्ही एक दिवसीय रजा आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी राज्यातील एसटीचे सर्व कामगार सहभागी होतील.