शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २६ हजार जणांची ‘घर वापसी’

By admin | Updated: January 14, 2015 06:31 IST

संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर

जमीर काझी, मुंबईसंघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर केल्याची माहिती गृह विभागाने एका अहवालाद्वारे राज्य सरकारला दिली आहे. यापैकी २६ हजार ३८८ जणांनी २००९ ते २००१२ या काळात खिश्चन धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश (घर वापसी) केला. तर १४९ जणांनी हिंदू धर्मातून अन्य धर्मांत स्वच्छेने प्रवेश केला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरोगामी राज्य म्हणून देशभरात ख्याती असलेल्या महाराष्ट्रात धार्मिकतेचा पगडा सुप्तपणे वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे समोर आले आहे. माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत धर्मांतराच्या एकूण सहा घटना घडल्या असल्या तरी अन्य धर्मांत गेलेल्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची त्यात एकही घटना नाही. आर्थिकदृष्ट्या हलाखीत असलेल्या खिश्चन व मुस्लीम धर्मातील स्त्री-पुरुषांना आर्थिक आमिष दाखवून पुन्हा ‘घर वापसी’ करण्याचा कार्यक्रम काही हिंदुत्वत्वादी संघटनांकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या एका धार्मिक सोहळ्यातून ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशात विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला होता. या विषयावरून संसदेचे कामकाज बंद पाडले होते. त्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या धर्मांतराच्या, मूळ धर्मात परत जाण्याच्या घटनांबाबतचा अहवाल गृह विभागाकडून मागविला होता.त्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये राज्यात विविध ठिकाणी धर्मांतराच्या एकूण ६ घटना घडल्या आहेत. त्यांत एकूण २६,३८८ जणांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे धर्मांतराचे कार्यक्रम रत्नागिरी, सांगली, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी झालेले असून, यामध्ये खिश्चन धर्मात गेलेल्या स्त्री-पुरुषांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यापैकी २००९ साली ‘घरवापसी’च्या सर्वाधिक ४ घटना घडल्या असून, त्यामध्ये तब्बल २४,४७६ नागरिक सहभागी होते. २०१० मध्ये २ घटनामध्ये १,५६२ जणांनी घरवापसी केली. तर २०१२ मध्ये एका धार्मिक सोहळ्यातून ३५० स्त्री-पुरुषांना हिंदू धर्मात घेण्यात आले. २०११, २०१३ व २०१४ या वर्षांमध्ये ‘घरवापसी’ची एकही घटना झाली नाही. सहा वर्षांमध्ये स्वच्छेने धर्मांतर करण्याच्या एकूण २६ घटना घडल्या असून, त्यातून १४९ स्त्री-पुरुषांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. त्यापैकी १६ घटनांमध्ये १६ हिंदूंनी व एका ख्रिश्चनाने इस्लामचा स्वीकार केला. तर विविध ठिकाणी झालेल्या १० घटनामध्ये १३२ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नोंदी पोलिसांच्या दप्तरी आहेत. यातील सर्व घटना स्वच्छेने झाल्या असून, आमिष अथवा जबरदस्तीने एकही घटना घडली नसल्याने संबंधित घटनांबाबत कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेली ही आकडेवारी असून, प्रत्यक्षात धर्मांतर केलेल्यांची संख्या त्याहून कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.