शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राज्यात २६ हजार जणांची ‘घर वापसी’

By admin | Updated: January 14, 2015 06:31 IST

संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर

जमीर काझी, मुंबईसंघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर केल्याची माहिती गृह विभागाने एका अहवालाद्वारे राज्य सरकारला दिली आहे. यापैकी २६ हजार ३८८ जणांनी २००९ ते २००१२ या काळात खिश्चन धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश (घर वापसी) केला. तर १४९ जणांनी हिंदू धर्मातून अन्य धर्मांत स्वच्छेने प्रवेश केला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुरोगामी राज्य म्हणून देशभरात ख्याती असलेल्या महाराष्ट्रात धार्मिकतेचा पगडा सुप्तपणे वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे समोर आले आहे. माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत धर्मांतराच्या एकूण सहा घटना घडल्या असल्या तरी अन्य धर्मांत गेलेल्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची त्यात एकही घटना नाही. आर्थिकदृष्ट्या हलाखीत असलेल्या खिश्चन व मुस्लीम धर्मातील स्त्री-पुरुषांना आर्थिक आमिष दाखवून पुन्हा ‘घर वापसी’ करण्याचा कार्यक्रम काही हिंदुत्वत्वादी संघटनांकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या एका धार्मिक सोहळ्यातून ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशात विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला होता. या विषयावरून संसदेचे कामकाज बंद पाडले होते. त्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या धर्मांतराच्या, मूळ धर्मात परत जाण्याच्या घटनांबाबतचा अहवाल गृह विभागाकडून मागविला होता.त्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये राज्यात विविध ठिकाणी धर्मांतराच्या एकूण ६ घटना घडल्या आहेत. त्यांत एकूण २६,३८८ जणांनी पुन्हा विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे धर्मांतराचे कार्यक्रम रत्नागिरी, सांगली, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी झालेले असून, यामध्ये खिश्चन धर्मात गेलेल्या स्त्री-पुरुषांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यापैकी २००९ साली ‘घरवापसी’च्या सर्वाधिक ४ घटना घडल्या असून, त्यामध्ये तब्बल २४,४७६ नागरिक सहभागी होते. २०१० मध्ये २ घटनामध्ये १,५६२ जणांनी घरवापसी केली. तर २०१२ मध्ये एका धार्मिक सोहळ्यातून ३५० स्त्री-पुरुषांना हिंदू धर्मात घेण्यात आले. २०११, २०१३ व २०१४ या वर्षांमध्ये ‘घरवापसी’ची एकही घटना झाली नाही. सहा वर्षांमध्ये स्वच्छेने धर्मांतर करण्याच्या एकूण २६ घटना घडल्या असून, त्यातून १४९ स्त्री-पुरुषांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. त्यापैकी १६ घटनांमध्ये १६ हिंदूंनी व एका ख्रिश्चनाने इस्लामचा स्वीकार केला. तर विविध ठिकाणी झालेल्या १० घटनामध्ये १३२ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नोंदी पोलिसांच्या दप्तरी आहेत. यातील सर्व घटना स्वच्छेने झाल्या असून, आमिष अथवा जबरदस्तीने एकही घटना घडली नसल्याने संबंधित घटनांबाबत कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेली ही आकडेवारी असून, प्रत्यक्षात धर्मांतर केलेल्यांची संख्या त्याहून कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.