शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

२६ केंद्रीय मंत्री राज्यभर फिरणार

By admin | Updated: May 24, 2016 03:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकास पर्व’ हे महाअभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी २६ केंद्रीय मंत्री, पक्षाचे राज्यातील मंत्री, खासदार, आमदार त्यासाठी राज्यभर फिरणार आहेत. भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील ‘वसंत स्मृती’मध्ये झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. या महाअभियानांतर्गत पक्षाचे नेते गावोगावी जाऊन सभा घेतील, जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतील. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती त्यांना देतील आणि उपलब्धीही सांगतील. विशेष म्हणजे हे नेते गावागावांत मुक्कामी जाणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री अन्य राज्यांमध्ये जाणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जातील. बीसीसीआयचे अध्यक्ष खा. अनुराग ठाकूर हे जालना जिल्ह्यात दौरा करतील. द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी भाजपाने शिवसेनेला सोबत घेतलेले नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासारखे एनडीएतील घटक पक्षाचे नेते येत आहेत; पण शिवसेनेच्या केंद्र वा राज्यातील मंत्र्यांचे यादीत नाव नाही. (विशेष प्रतिनिधी)समाधान शिबिराचा पॅटर्न राज्यभरात : हिंगणघाटचे भाजपा आमदार समीर कुणावार यांनी आपल्या मतदारसंघात राबविलेल्या समाधान शिबिराचे सादरीकरण आजच्या बैठकीत केले. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्याची प्रशंसा करून अशी शिबिरे भाजपाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात घ्यावीत, असे सांगितले. भाजपाचे मिशन निवडणूक : महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या वर्षाअखेर होत असलेल्या निवडणुकीसाठी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या बैठकीत केले. गावातील विकास कामांचे प्रस्ताव पक्षाच्या यंत्रणेमार्फत पाठवा. ते तातडीने मंजूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.पक्ष खडसेंच्या पाठीशी : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली.