शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

२६ केंद्रीय मंत्री राज्यभर फिरणार

By admin | Updated: May 24, 2016 03:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला २६ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त प्रदेश भाजपाच्या वतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकास पर्व’ हे महाअभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी २६ केंद्रीय मंत्री, पक्षाचे राज्यातील मंत्री, खासदार, आमदार त्यासाठी राज्यभर फिरणार आहेत. भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील ‘वसंत स्मृती’मध्ये झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. या महाअभियानांतर्गत पक्षाचे नेते गावोगावी जाऊन सभा घेतील, जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतील. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती त्यांना देतील आणि उपलब्धीही सांगतील. विशेष म्हणजे हे नेते गावागावांत मुक्कामी जाणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री अन्य राज्यांमध्ये जाणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जातील. बीसीसीआयचे अध्यक्ष खा. अनुराग ठाकूर हे जालना जिल्ह्यात दौरा करतील. द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी भाजपाने शिवसेनेला सोबत घेतलेले नाही. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासारखे एनडीएतील घटक पक्षाचे नेते येत आहेत; पण शिवसेनेच्या केंद्र वा राज्यातील मंत्र्यांचे यादीत नाव नाही. (विशेष प्रतिनिधी)समाधान शिबिराचा पॅटर्न राज्यभरात : हिंगणघाटचे भाजपा आमदार समीर कुणावार यांनी आपल्या मतदारसंघात राबविलेल्या समाधान शिबिराचे सादरीकरण आजच्या बैठकीत केले. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्याची प्रशंसा करून अशी शिबिरे भाजपाच्या सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात घ्यावीत, असे सांगितले. भाजपाचे मिशन निवडणूक : महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या वर्षाअखेर होत असलेल्या निवडणुकीसाठी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या बैठकीत केले. गावातील विकास कामांचे प्रस्ताव पक्षाच्या यंत्रणेमार्फत पाठवा. ते तातडीने मंजूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.पक्ष खडसेंच्या पाठीशी : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली.