शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तब्बल २५ रस्ते होणार चकाचक

By admin | Updated: August 27, 2016 00:51 IST

लोकसंख्या वाढली, माणसांइतकीच वाहने झाली; रस्ते मात्र जसे आहेत तसेच राहिले.

पुणे : लोकसंख्या वाढली, माणसांइतकीच वाहने झाली; रस्ते मात्र जसे आहेत तसेच राहिले. फार तर त्यांची रुंदी थोडी वाढली; मात्र त्यांच्या मूळ स्वरूपात काहीही बदल झाला नाही. हेच लक्षात घेऊन महापालिका आता शहरातील तब्बल २५ रस्ते परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर नवे करीत आहे. महापालिकेने काही खासगी कंपन्यांना या रस्त्यांच्या डिझाईनचे काम दिले असून, त्यातून या रस्त्यांचे स्वरूपच पूर्णपणे बदलून जाणार आहे.शहरातील वाहनांची संख्या वाढत असली, तरी त्यांची रुंदी वाढविणे आता शक्य नाही. तरीही वाहतुकीला शिस्त लावायची असेल, तर काय करता येईल, या विचारातून परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर हे रस्ते नव्याने तयार करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. रस्त्यांबरोबरच त्यांना जोडून असलेल्या पदपथांचाही यात समावेश आहे. रस्त्यांचा आकार कसा आहे, त्याची लांबी किती आहे, त्यावरची वाहतूक किती या सर्व गोष्टींचा विचार करून रस्त्यांचे डिझाईन तयार करण्यात येणार आहे. ते करताना रस्त्याची गरज काय आहे, हेही पाहिले जाईल.परदेशातील रस्त्यांना असतात तशा लेन (पट्टे आखून निश्चित केलेले मार्ग) या रस्त्यांवर तयार करण्यात येणार आहेत. बस असेल तर बससाठीच्या लेनमधूनच जाईल (बीआरटी), स्वयंचलित खासगी चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन असेल. त्या-त्या वाहनांकडून या लेन बदलल्या जात नाहीत; त्याचबरोबर सायकल चालविणाऱ्यांसाठी पदपथाच्या कडेने एक स्वतंत्र लेन तयार करण्यात येईल. एखाद्या रस्त्यावर त्याच्या अरुंदपणामुळे हे करणे शक्य नसेल तिथे वाहन लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ बांधण्यासारख्या उपायांचा अवलंब करण्यात येणार आहे. >सुरक्षेचा विचार करून सायकल ट्रॅक : वाहतूककोंडी टळणारपदपथांचाही यात स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. पदपथांवरून फिरणे आनंददायी करण्याचा प्रयत्न यात असेल. त्यासाठी विशिष्ट अंतरांवर बसण्यासाठी जागा, शिस्तीत बसलेले विक्रेते, ग्रीनरी या पदपथांवर असेल. सायकल ट्रॅकची रचनाही सुरक्षेचा विचार करून करण्यात येणार आहे.शहरासाठी १ हजार ५०० वाहने घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ७५ किलोमीटर लांबीचे पदपथ तयार करण्यात येतील. २५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक व ३० किलोमीटरचा बीआरटी मार्ग तयार करण्यात येणार आहे. नव्या गाड्या रस्त्यावर आल्या, तरीही वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यांचे डिझाईन करण्यास या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यांनी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सुचविलेल्या उपायांचा प्राथमिक खर्चही त्यांनी अहवालासोबत प्रशासनाला द्यायचा आहे. ६ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, त्याची तयारी संबंधित कंपन्यांनी सुरू केली आहे.रस्त्यावरच्या प्रत्येक चौकात तिथे येणारी, थांबणारी, सिग्नल मिळाला की पुढे जाणारी, सिग्नल तोडून पुढे जाणारी सर्व वाहने नियंत्रण कक्षात मॉनिटरवर दिसतील, अशी यंत्रणा प्रत्येक रस्त्यावर असेल.