शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तब्बल २५ रस्ते होणार चकाचक

By admin | Updated: August 27, 2016 00:51 IST

लोकसंख्या वाढली, माणसांइतकीच वाहने झाली; रस्ते मात्र जसे आहेत तसेच राहिले.

पुणे : लोकसंख्या वाढली, माणसांइतकीच वाहने झाली; रस्ते मात्र जसे आहेत तसेच राहिले. फार तर त्यांची रुंदी थोडी वाढली; मात्र त्यांच्या मूळ स्वरूपात काहीही बदल झाला नाही. हेच लक्षात घेऊन महापालिका आता शहरातील तब्बल २५ रस्ते परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर नवे करीत आहे. महापालिकेने काही खासगी कंपन्यांना या रस्त्यांच्या डिझाईनचे काम दिले असून, त्यातून या रस्त्यांचे स्वरूपच पूर्णपणे बदलून जाणार आहे.शहरातील वाहनांची संख्या वाढत असली, तरी त्यांची रुंदी वाढविणे आता शक्य नाही. तरीही वाहतुकीला शिस्त लावायची असेल, तर काय करता येईल, या विचारातून परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर हे रस्ते नव्याने तयार करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. रस्त्यांबरोबरच त्यांना जोडून असलेल्या पदपथांचाही यात समावेश आहे. रस्त्यांचा आकार कसा आहे, त्याची लांबी किती आहे, त्यावरची वाहतूक किती या सर्व गोष्टींचा विचार करून रस्त्यांचे डिझाईन तयार करण्यात येणार आहे. ते करताना रस्त्याची गरज काय आहे, हेही पाहिले जाईल.परदेशातील रस्त्यांना असतात तशा लेन (पट्टे आखून निश्चित केलेले मार्ग) या रस्त्यांवर तयार करण्यात येणार आहेत. बस असेल तर बससाठीच्या लेनमधूनच जाईल (बीआरटी), स्वयंचलित खासगी चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन असेल. त्या-त्या वाहनांकडून या लेन बदलल्या जात नाहीत; त्याचबरोबर सायकल चालविणाऱ्यांसाठी पदपथाच्या कडेने एक स्वतंत्र लेन तयार करण्यात येईल. एखाद्या रस्त्यावर त्याच्या अरुंदपणामुळे हे करणे शक्य नसेल तिथे वाहन लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ बांधण्यासारख्या उपायांचा अवलंब करण्यात येणार आहे. >सुरक्षेचा विचार करून सायकल ट्रॅक : वाहतूककोंडी टळणारपदपथांचाही यात स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. पदपथांवरून फिरणे आनंददायी करण्याचा प्रयत्न यात असेल. त्यासाठी विशिष्ट अंतरांवर बसण्यासाठी जागा, शिस्तीत बसलेले विक्रेते, ग्रीनरी या पदपथांवर असेल. सायकल ट्रॅकची रचनाही सुरक्षेचा विचार करून करण्यात येणार आहे.शहरासाठी १ हजार ५०० वाहने घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ७५ किलोमीटर लांबीचे पदपथ तयार करण्यात येतील. २५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक व ३० किलोमीटरचा बीआरटी मार्ग तयार करण्यात येणार आहे. नव्या गाड्या रस्त्यावर आल्या, तरीही वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यांचे डिझाईन करण्यास या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यांनी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सुचविलेल्या उपायांचा प्राथमिक खर्चही त्यांनी अहवालासोबत प्रशासनाला द्यायचा आहे. ६ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, त्याची तयारी संबंधित कंपन्यांनी सुरू केली आहे.रस्त्यावरच्या प्रत्येक चौकात तिथे येणारी, थांबणारी, सिग्नल मिळाला की पुढे जाणारी, सिग्नल तोडून पुढे जाणारी सर्व वाहने नियंत्रण कक्षात मॉनिटरवर दिसतील, अशी यंत्रणा प्रत्येक रस्त्यावर असेल.