शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

वर्धेतील २५ पूल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना

By admin | Updated: August 4, 2016 16:55 IST

कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे.

- पराग मगरवर्धा, दि. ४ - कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे. वर्धा जिल्ह्यातही जवळपास २५ पुलांनी शंभरी गाठली आहे. पुलगाव येथील रेल्वे पूल तर १५० वर्षे जुना आहे. पर्यायी व्यवस्था करून नवीन पूल बांधले असले तरी जुन्या पुलांवरून काही प्रमाणात वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलांचे सरकार आता काय करणार, की दुसरी दुर्घटना घडल्यावरच एजबार झालेले पूल पाडले जाणार हा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील सर्वाधिक विदारक स्थिती ही आष्टी(शहीद) तालुक्याची आहे. या तालुक्यातील तब्बल सहा पुलांनी शंभरी पार केली आहे.

यामध्ये नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका पूल, आष्टी-साहूर द्रूगवाडा राज्यमार्ग क्र. २४४ वरील पूल, आष्टी-मोर्शी रस्त्यावर अप्पर वर्धा धरणासमोरील पूल, आष्टी परसोडा मार्गावर लेंडी नदीवरील पूल, आष्टी-साहूर मार्गावर धाडी गावापूर्वी असलेला जामचा पूल आणि आष्टी-परसोडा मार्गावरील अन्य एक पूल या सहा पुलांनी शंभरी गाठली आहे. तर २४ लहान पुल हे अखेरच्या घटना मोजत आहेत. यातील काही पुलांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येते.

त्याचप्रमाणे वर्धा-नागपूर राज्य महामार्गावर पवनार या गावी धाम नदीवर असलेल्या पुलानेही शंभरी पार केली आहे. येथे पर्यायी मोठा पूल बांधला असला तरी या मार्गावरूनही किरकोळ वाहतूक होते. त्यातच सदर पूल सेवाग्राम आश्रमला जोडणारा असल्याने त्याचे वेगळे महत्वही आहे. याच मार्गावर सेलू येथे बोरा नदीवरील लहान पूलही शंभर वर्षांचा झाला आहे. येथेही नवीन पूल बांधण्यात आला असला तरी लहान पुलावरून किरकोळ वाहतूक होते. कारंजा तालुक्यातील जवळपास १५ पूल हे जीर्णावस्थेत आहेत. यातील अनेकांच्या मुदती संपल्या आहेत, तर काही पूल पूर्णत: ढासळून अपघातास निमंत्रण देत आहेत.

पुलगाव येथील १५० वर्षांचा रेल्वे पूल जीवघेणाब्रिटीश राजवटीत मुंबई हावडा ही देशातील दोन मोठी शहर रेल्वे, मार्गाने जोडून दळणवळणाचा मार्ग सुकर करावा या भावनेतून रेल्वे मार्ग उभारण्यात आला. या मार्गावर वर्धा नदीवर पुलगाव येथे १८६५ रोजी रेल्वेपूल उभारण्यात आला. या पुलाला १५० वर्षे झाली आहेत. दररोज सतत रेल्वे गाड्यांचा भार सहन करीत आहे. दररोज शेकडो गाड्या या पुलावरून धावतात. सदर पूल कालबाह्य झाल्याचे पत्रही ब्रिटिश शासनाने भारत सरकारला पाठविले आहे. या संदर्भात 'लोकमत'ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या बातम्यांमुळे काही महिन्यांपूर्वीच या पुलाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही सदर पूल धोक्याचा असून येथे दुसरा समांतर पूल बांधणे गरजेचे झाले आहे.