शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील २५ पूल मरणपंथाला, पुलगावचा पुल तर १५० वर्ष जुना

By admin | Updated: August 4, 2016 16:55 IST

कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे.

- पराग मगरवर्धा, दि. ४ - कुठलीही जीवितहानी झाल्याशिवाय उपाययोजना न करणे ही नित्याची बाब झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटनाही त्याचेच द्योतक आहे. वर्धा जिल्ह्यातही जवळपास २५ पुलांनी शंभरी गाठली आहे. पुलगाव येथील रेल्वे पूल तर १५० वर्षे जुना आहे. पर्यायी व्यवस्था करून नवीन पूल बांधले असले तरी जुन्या पुलांवरून काही प्रमाणात वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे या पुलांचे सरकार आता काय करणार, की दुसरी दुर्घटना घडल्यावरच एजबार झालेले पूल पाडले जाणार हा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील सर्वाधिक विदारक स्थिती ही आष्टी(शहीद) तालुक्याची आहे. या तालुक्यातील तब्बल सहा पुलांनी शंभरी पार केली आहे.

यामध्ये नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका पूल, आष्टी-साहूर द्रूगवाडा राज्यमार्ग क्र. २४४ वरील पूल, आष्टी-मोर्शी रस्त्यावर अप्पर वर्धा धरणासमोरील पूल, आष्टी परसोडा मार्गावर लेंडी नदीवरील पूल, आष्टी-साहूर मार्गावर धाडी गावापूर्वी असलेला जामचा पूल आणि आष्टी-परसोडा मार्गावरील अन्य एक पूल या सहा पुलांनी शंभरी गाठली आहे. तर २४ लहान पुल हे अखेरच्या घटना मोजत आहेत. यातील काही पुलांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येते.

त्याचप्रमाणे वर्धा-नागपूर राज्य महामार्गावर पवनार या गावी धाम नदीवर असलेल्या पुलानेही शंभरी पार केली आहे. येथे पर्यायी मोठा पूल बांधला असला तरी या मार्गावरूनही किरकोळ वाहतूक होते. त्यातच सदर पूल सेवाग्राम आश्रमला जोडणारा असल्याने त्याचे वेगळे महत्वही आहे. याच मार्गावर सेलू येथे बोरा नदीवरील लहान पूलही शंभर वर्षांचा झाला आहे. येथेही नवीन पूल बांधण्यात आला असला तरी लहान पुलावरून किरकोळ वाहतूक होते. कारंजा तालुक्यातील जवळपास १५ पूल हे जीर्णावस्थेत आहेत. यातील अनेकांच्या मुदती संपल्या आहेत, तर काही पूल पूर्णत: ढासळून अपघातास निमंत्रण देत आहेत.

पुलगाव येथील १५० वर्षांचा रेल्वे पूल जीवघेणाब्रिटीश राजवटीत मुंबई हावडा ही देशातील दोन मोठी शहर रेल्वे, मार्गाने जोडून दळणवळणाचा मार्ग सुकर करावा या भावनेतून रेल्वे मार्ग उभारण्यात आला. या मार्गावर वर्धा नदीवर पुलगाव येथे १८६५ रोजी रेल्वेपूल उभारण्यात आला. या पुलाला १५० वर्षे झाली आहेत. दररोज सतत रेल्वे गाड्यांचा भार सहन करीत आहे. दररोज शेकडो गाड्या या पुलावरून धावतात. सदर पूल कालबाह्य झाल्याचे पत्रही ब्रिटिश शासनाने भारत सरकारला पाठविले आहे. या संदर्भात 'लोकमत'ने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या बातम्यांमुळे काही महिन्यांपूर्वीच या पुलाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही सदर पूल धोक्याचा असून येथे दुसरा समांतर पूल बांधणे गरजेचे झाले आहे.