शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

२५ टक्के आरक्षित प्रवेशाची लॉटरी जाहीर

By admin | Updated: May 14, 2014 01:54 IST

शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशाची लॉटरी मंगळवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली.

मुंबई :शिक्षण हक्क कायद्यामधील तरतुदीनुसार आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलांचे खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशाची लॉटरी मंगळवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. पहिल्या फेरीत ३ हजार ३८0 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ५७ खासगी शाळांतील १ हजार ५६९ जागांसाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. तर उर्वरित विद्यार्थ्यांना पसंतीप्रमाणे प्रवेश देण्यात आले. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मुंबई आणि परिसरातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षणाची लॉटरी मंगळवारी काढण्यात आली. पालिका क्षेत्रातील ३१२ शाळांमध्ये ८ हजार २२३ जागांसाठी ६ हजार ५७५ अर्ज प्राप्त झाले होते. ५७ शाळांसाठीच प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने ५७ शाळांचीच लॉटरी काढण्यात आली. तसेच १७१ शाळांमधील ५ हजार १८६ जागांसाठी अर्ज केलेल्या १ हजार ८११ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी २0 मेपर्यंत संबंधीत शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. या विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. २0 मेपर्यंत विद्यार्थ्यांनी संबंधीत शाळेत प्रवेश न घेतल्यास त्यांचा प्रवेश बाद ठरणार आहे.८४ शाळांसाठी १ हजार ४६८ जागा उपलब्ध असताना एकही अर्ज प्राप्त झाला नाही. मंगळवारच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांना दुसर्‍या टप्प्यात ऑनलाईन प्रवेश देण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेणार असल्याचे, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निि›त झाल्यानंतरच दुसर्‍या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.