शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

महाराष्ट्रातील २५ पक्ष ‘आउट’

By admin | Updated: December 26, 2016 01:06 IST

निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.

हरीश गुप्ता / नवी दिल्लीनिवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश पक्षांची नोंदणी ही मुंबईतील आहे. रद्द करण्यात आलेल्या या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे; पण २००५नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढविलेली नाही. देणग्या आणि करातून सूट याचा लाभ मात्र या पक्षांकडून घेण्यात येत होता. या राजकीय पक्षांनी निवडणूकच लढविली नाही आणि याच कारणास्तव त्यांची नोंदणी किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री असणाऱ्या या पक्षांविरुद्ध कार्यवाहीसाठी आयोगाने अन्य पर्याय निवडला. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला एक पत्र देऊन महाराष्ट्रातील या २५ पक्षांना त्यांच्या यादीतून हटविण्याबाबत त्यांनी सांगितले. हे पक्ष देणग्या आणि अन्य लाभ घेत होते. गोव्यातील चार राजकीय पक्षांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे. हे पक्ष यादीतून बाहेर१. अखिल भारतीय भारत माता-पुत्र पक्ष (धुळे), २. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सेना (पुणे), ३. बहुजन महासंघ पक्ष (अकोला), ४. भारतीय संताजी पार्टी, नागपूर, ५. काँग्रेस आॅफ पिपल (मुंबई), ६. लोक राज्य पार्टी (मुंबई), ७. महाराष्ट्र प्रदेश क्रांतीकारी पार्टी (सातारा), ८. महाराष्ट्र राजीव काँग्रेस (मुंबई), ९. महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (मुंबई), १०. महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), ११. नारीशक्ती पाटी (मुंबई), १२. नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), १३. नॅशनल मायनॉरिटी पार्टी (मुंबई), १४. नॅशनल रिपब्लिक पार्टी (मुंबई), १५. नेटिव्ह पीपल्स पार्टी (मुंबई), १६. नवमहाराष्ट्र विकास पार्टी (मुंबई), १७. नेताजी काँग्रेस सेना (पुणे), १८. पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग आॅफ इंडिया (नागपूर), १९. रिपब्लिक मुव्हमेंट (चंद्रपूर), २०. सचेत भारत पार्टी (मुंबई), २१. समाजवादी जनता पार्टी (महाराष्ट्र) (मुंबई), २२. दी कन्झ्युमर पार्टी आॅफ इंडिया (मुंबई), २३. विदर्भ जनता काँग्रेस (नागपूर), २४. विदर्भ राज्य मुक्ती मोर्चा (नागपूर), २५. वूमनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मुंबई).