शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

पंचवीस लाखांचा निधी परत

By admin | Updated: January 18, 2016 21:17 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळालेला 25 लाख रुपयांचा निधी आयोजक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने परत केला आहे.

- स्वागताध्यक्षांचा निर्णय: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी
 
विश्वास मोरे/ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) :  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळालेला 25 लाख रुपयांचा निधी आयोजक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने परत केला आहे. हा निधी साहित्य महामंडळाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वापरावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी  केले.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोमवारी झाली. साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद आणि सुनियोजनाने हे संमेलन आगळेवेगळे ठरले.  श्रीमंती थाटाचे संमेलन अशी टीका झाली; मात्र शासनाकडून मिळालेला निधी परत करून आणि ‘नाम’ फाउंडेशनला 1 कोटीची मदत देऊन संयोजक डॉ. पाटील यांनी या टिकेला कृतीशील उत्तर दिले.
डॉ. म्हणाले,  साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी राज्य सरकारने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. तो महामंडळाने संयोजक म्हणून आम्हाला दिला होता. परंतु, आम्ही तो महामंडळाला परत करणार असून, त्याचा उपयोग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करावा, अशी अपेक्षा आहे. ग्रंथप्रदर्शन आणि विक्रीला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याची नोंद झाली आहे. पहिल्या तीन दिवसांतच सुमारे चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. ग्रंथदालनातून 22 लाख उत्पन्न मिळाले. त्यात 78 लाख रुपयांची भर टाकून एक कोटी रुपयांचा निधी ‘नाम फाउंडेशन’ला दिला आहे. अशा प्रकारे संमेलनातून सामाजिक भान राखल्याचेही समाधान डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.