शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

By admin | Updated: April 21, 2016 03:18 IST

लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले.

५० वॅगनची पहिली खेप : १० वॅगनच्या झाल्या ९ खेपालातूर : लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले. मंगळवारी रात्री १०.५५ वाजता मिरजहून निघालेली ही जलपरी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता २५ लाख लिटर पाणी घेऊन पोहोचली. पाणीटंचाई असलेल्या भागांत रेल्वेद्वारे एकाचवेळी २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक केली जाण्याची ही देशात पहिलीच वेळ असावी. जलपरीच आगमन झाल्यानंतर ८.३० वाजेपासून ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लातूर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत हे पाणी साठविले जात आहे. त्यानंतर ते टँकरच्या सहाय्याने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात व तेथून टँकरने शहरात वितरीत केले जाणार आहे.या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून, डोंगरगाव, साई येथून बुधवारी उपलब्ध होणाऱ्या पाण्यापेक्षा रेल्वेचे हे पाणी जास्त आहे. बुधवारी सकाळी आलेल्या जलपरीतील पाणी ४.४५ वाजेपर्यंत उतरवून घेण्यात आले. या जलपरीचे स्वागत महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. रेल्वेचे मुख्य मोटारमन सुनील खोत आणि सहाय्यक मोटारमन बी.जे. पोळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वॅगन रिकामे करण्यास विलंबरेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीत ५० वॅगनमधील पाणी उतरविण्यात येत असताना विहिरीपासून टँकर पॉर्इंटपर्यंत बसविण्यात आलेला पाईप निसटला. त्यामुळे रेल्वे वॅगन रिकामी करण्यास विलंब झाला. जवळपास आठ तासांचा कालावधी वॅगन रिकामे होण्यास लागला. पुरवठा करणाऱ्या विहिरीवर सीसीटीव्ही लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरवर रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा साठा व उपसा करण्यात येणाऱ्या हैदरखान विहिरीच्या काठावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सायंकाळी जलपरी मिरजेकडे रवाना बुधवारी सकाळी आलेली जलपरी रिकामी होण्यास तब्बल आठ तासांचा कालावधी लागला. पाणी उतरवून घेतल्यानंतर जलपरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिरजेकडे रवाना झाली असल्याचे लातूर रेल्वे स्थानकातील व्यवसाय विभागातील मुख्य इन्स्पेक्टर आर.टी. काळे यांनी सांगितले. >रेल्वेमंत्री मिरजेत येणार ? लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने मिरजेतील रेल्वे विभागाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आठवड्यात मिरज व लातूर येथे भेट देऊन रेल्वेच्या या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत.