शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

By admin | Updated: April 21, 2016 03:18 IST

लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले.

५० वॅगनची पहिली खेप : १० वॅगनच्या झाल्या ९ खेपालातूर : लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले. मंगळवारी रात्री १०.५५ वाजता मिरजहून निघालेली ही जलपरी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता २५ लाख लिटर पाणी घेऊन पोहोचली. पाणीटंचाई असलेल्या भागांत रेल्वेद्वारे एकाचवेळी २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक केली जाण्याची ही देशात पहिलीच वेळ असावी. जलपरीच आगमन झाल्यानंतर ८.३० वाजेपासून ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लातूर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत हे पाणी साठविले जात आहे. त्यानंतर ते टँकरच्या सहाय्याने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात व तेथून टँकरने शहरात वितरीत केले जाणार आहे.या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून, डोंगरगाव, साई येथून बुधवारी उपलब्ध होणाऱ्या पाण्यापेक्षा रेल्वेचे हे पाणी जास्त आहे. बुधवारी सकाळी आलेल्या जलपरीतील पाणी ४.४५ वाजेपर्यंत उतरवून घेण्यात आले. या जलपरीचे स्वागत महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. रेल्वेचे मुख्य मोटारमन सुनील खोत आणि सहाय्यक मोटारमन बी.जे. पोळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वॅगन रिकामे करण्यास विलंबरेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीत ५० वॅगनमधील पाणी उतरविण्यात येत असताना विहिरीपासून टँकर पॉर्इंटपर्यंत बसविण्यात आलेला पाईप निसटला. त्यामुळे रेल्वे वॅगन रिकामी करण्यास विलंब झाला. जवळपास आठ तासांचा कालावधी वॅगन रिकामे होण्यास लागला. पुरवठा करणाऱ्या विहिरीवर सीसीटीव्ही लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरवर रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा साठा व उपसा करण्यात येणाऱ्या हैदरखान विहिरीच्या काठावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सायंकाळी जलपरी मिरजेकडे रवाना बुधवारी सकाळी आलेली जलपरी रिकामी होण्यास तब्बल आठ तासांचा कालावधी लागला. पाणी उतरवून घेतल्यानंतर जलपरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिरजेकडे रवाना झाली असल्याचे लातूर रेल्वे स्थानकातील व्यवसाय विभागातील मुख्य इन्स्पेक्टर आर.टी. काळे यांनी सांगितले. >रेल्वेमंत्री मिरजेत येणार ? लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने मिरजेतील रेल्वे विभागाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आठवड्यात मिरज व लातूर येथे भेट देऊन रेल्वेच्या या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत.