शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाख लिटर पाणी घेऊन जलपरी लातुरात

By admin | Updated: April 21, 2016 03:18 IST

लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले.

५० वॅगनची पहिली खेप : १० वॅगनच्या झाल्या ९ खेपालातूर : लातूर शहरासाठी मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत १० वॅगनच्या नऊ खेपा पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास जलपरीचे ५० वॅगन घेऊन लातूर रेल्वेस्थानकात आगमन झाले. मंगळवारी रात्री १०.५५ वाजता मिरजहून निघालेली ही जलपरी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता २५ लाख लिटर पाणी घेऊन पोहोचली. पाणीटंचाई असलेल्या भागांत रेल्वेद्वारे एकाचवेळी २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक केली जाण्याची ही देशात पहिलीच वेळ असावी. जलपरीच आगमन झाल्यानंतर ८.३० वाजेपासून ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लातूर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत हे पाणी साठविले जात आहे. त्यानंतर ते टँकरच्या सहाय्याने आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात व तेथून टँकरने शहरात वितरीत केले जाणार आहे.या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असून, डोंगरगाव, साई येथून बुधवारी उपलब्ध होणाऱ्या पाण्यापेक्षा रेल्वेचे हे पाणी जास्त आहे. बुधवारी सकाळी आलेल्या जलपरीतील पाणी ४.४५ वाजेपर्यंत उतरवून घेण्यात आले. या जलपरीचे स्वागत महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केले. रेल्वेचे मुख्य मोटारमन सुनील खोत आणि सहाय्यक मोटारमन बी.जे. पोळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वॅगन रिकामे करण्यास विलंबरेल्वे स्थानकालगत असलेल्या विहिरीत ५० वॅगनमधील पाणी उतरविण्यात येत असताना विहिरीपासून टँकर पॉर्इंटपर्यंत बसविण्यात आलेला पाईप निसटला. त्यामुळे रेल्वे वॅगन रिकामी करण्यास विलंब झाला. जवळपास आठ तासांचा कालावधी वॅगन रिकामे होण्यास लागला. पुरवठा करणाऱ्या विहिरीवर सीसीटीव्ही लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरवर रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा साठा व उपसा करण्यात येणाऱ्या हैदरखान विहिरीच्या काठावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सायंकाळी जलपरी मिरजेकडे रवाना बुधवारी सकाळी आलेली जलपरी रिकामी होण्यास तब्बल आठ तासांचा कालावधी लागला. पाणी उतरवून घेतल्यानंतर जलपरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिरजेकडे रवाना झाली असल्याचे लातूर रेल्वे स्थानकातील व्यवसाय विभागातील मुख्य इन्स्पेक्टर आर.टी. काळे यांनी सांगितले. >रेल्वेमंत्री मिरजेत येणार ? लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने मिरजेतील रेल्वे विभागाला रोख पारितोषिक जाहीर केले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पुढील आठवड्यात मिरज व लातूर येथे भेट देऊन रेल्वेच्या या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत.