शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अकरावीच्या २५% जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 05:35 IST

मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश १०० टक्के आॅनलाइन पद्धतीनेच देण्याचे आदेश या वेळी उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश १०० टक्के आॅनलाइन पद्धतीनेच देण्याचे आदेश या वेळी उच्च न्यायालयाने दिले आहेत. आॅनलाइन प्रवेशामुळे न्याय्य प्रवेश मिळणार असले, तरी सहा फेऱ्यांनंतरही प्रवेश मिळालेले विद्यार्थी नाखूश असल्याचे चित्र आहे. शिवाय अद्यापही कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या सुमारे २५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश आॅनलाइनने होत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मीरा-भार्इंदर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल नगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. महानगर क्षेत्रात कला शाखेची २८७, वाणिज्यची ७६४ आणि विज्ञान शाखेची ५०४ अशी एकूण १ हजार ५५५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात कला शाखेसाठी ३५ हजार २६९, वाणिज्यसाठी १ लाख ५७ हजार ६२२ आणि विज्ञान शाखेसाठी ८५ हजार ३३१ जागा उपलब्ध आहेत. या एकूण २ लाख ७८ हजार २२२ जागांसाठी आॅनलाइनच्या पाच गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या. त्यानंतरही प्रवेश बदल करण्यासाठी एक विशेष फेरी घेण्यात आली. मात्र, या सहा फेऱ्यांनंतरही एकूण २ लाख २ हजार ८६८ जागांवर प्रवेश घेण्यात आले आहेत, तर एकूण ७५ हजार ३५४ जागा अद्याप रिक्त आहेत. (प्रतिनिधी)>अनेकांना हवे आहेत प्रवेशबदलअकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. मात्र, प्रवेश बदल करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पहिल्या विशेष फेरीत सुमारे ६७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलण्याचा प्रयत्न केला, तर सुमारे ४४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशात बदल केला. त्यानंतर, दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश बदल करण्यासाठी आणि नव्याने प्रवेश घेण्यासाठी शनिवारपर्यंत २४ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थी मिळालेल्या प्रवेशाबद्दल नाखूश असल्याचे दिसते. परिणामी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन समाधानी करताना, रिक्त जागा भरण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.नियम उल्लंघनप्रकरणी जयहिंदची चौकशी अकरावी आॅनलाइन प्रक्रियेमध्ये शुल्क भरताना जयहिंद महाविद्यालयाने स्क्रॅच कार्ड प्रणालीचा उपयोग केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जयहिंद महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यात यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश शुल्क भरताना ‘स्क्रॅच कार्ड’ प्रणालीचा उपयोग केला. ही प्रक्रिया नियमांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. या प्रकरणाचा पाठपुरावा मनविसेने केला. शिवाय ही बाब शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत, महाविद्यालयाची सखोल चौकशी व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.