शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

By admin | Updated: June 18, 2017 00:59 IST

पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी गेले असून, मुंबईत ७ बळी गेले आहेत, ही माहिती नुकतीच आरोग्य विभागाने दिली. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांमध्ये ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. विशेष करून मागील वर्षापेक्षा यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. २०१५ मध्ये स्वाइन फ्लूचे ३,०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण आढळले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत १७७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर-उपनगरातील ई, जी/नॉर्थ, के/ईस्ट, के/वेस्ट, एम/ईस्ट, एस आणि टी या पालिकेच्या विभागात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत.जून महिन्यात १ ते १५ या दरम्यान मुंबईत डेंग्यूचे १२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या वर्षी मे महिन्यात ४,४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४,१७१ रुग्णांची नोंद झाली होती. मे २०१६ मध्ये लेप्टोचे २ रुग्ण आढळले होते. या वर्षी आजपर्यंत लेप्टोचे ६ रुग्ण आढळले होते. मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टो व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना, गेस्ट्रो, कावीळ रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खासगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही.काळजी घ्या...स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, ताप व आजाराची अन्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधे वेळेवर घ्यावीत, असे आवाहन, मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.