शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी

By admin | Updated: June 18, 2017 00:59 IST

पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसासोबत साथीचे रोग डोकेवर काढत असताना, अजूनही राज्यात स्वाइन फ्लूचाही धोका जाणवत आहे. जानेवारी ते १५ जून २०१७ या अवघ्या सव्वा पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी गेले असून, मुंबईत ७ बळी गेले आहेत, ही माहिती नुकतीच आरोग्य विभागाने दिली. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांमध्ये ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. विशेष करून मागील वर्षापेक्षा यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. २०१५ मध्ये स्वाइन फ्लूचे ३,०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण आढळले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. २०१७मध्ये मुंबईत आतापर्यंत १७७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर-उपनगरातील ई, जी/नॉर्थ, के/ईस्ट, के/वेस्ट, एम/ईस्ट, एस आणि टी या पालिकेच्या विभागात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत.जून महिन्यात १ ते १५ या दरम्यान मुंबईत डेंग्यूचे १२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या वर्षी मे महिन्यात ४,४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४,१७१ रुग्णांची नोंद झाली होती. मे २०१६ मध्ये लेप्टोचे २ रुग्ण आढळले होते. या वर्षी आजपर्यंत लेप्टोचे ६ रुग्ण आढळले होते. मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टो व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना, गेस्ट्रो, कावीळ रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खासगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही.काळजी घ्या...स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, ताप व आजाराची अन्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधे वेळेवर घ्यावीत, असे आवाहन, मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.