शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

राज्यात २४ टक्के कमी पाऊस

By admin | Updated: October 8, 2015 05:38 IST

यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत

पुणे : यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तर सरासरीपेक्षाही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विदर्भ विभागात बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरीइतका बरसला आहे. यंदाच्या हंगामात मॉन्सूनने बळीराजाला प्रचंड ओढ दिली आहे. मॉन्सून दाखल झाल्यापासून १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ यादरम्यान राज्यात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला आहे. परभणीमध्ये तर सरासरीपेक्षा ५५ टक्कयांनी पाऊस कमी झाला आहे. यंदा मॉन्सून राज्यात दाखल झाल्यापासून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अल्पच राहिले आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)देशात १४ टक्के कमी पाऊसमहाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांनासुद्धा एल निनोचा फटका बसला असून, अनेक राज्यांमध्ये यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी झाला आहे़ पूर्व उत्तर प्रदेशात सर्वाधिक सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दिल्ली- ४३, हरियाणा- ३७, पूर्व मध्य प्रदेश- २९, बिहार, उत्तराखंड- २८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ गुजरात- ६ टक्के, पश्चिम मध्य प्रदेश- ४, आंध्र किनारपट्टी- १०, पश्चिम बंगाल किनारपट्टी- ८ आणि अरुणाचल प्रदेश- ६ टक्के या काही विभागांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे़ बाकी अन्य सर्व हवामान विभागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ विभागनिहाय पाऊसविभागसरासरीपेक्षा कमीकोकण व गोवा३२%मध्य महाराष्ट्र३४%मराठवाडा४१%विदर्भ१२%सर्वाधिक दुष्काळी जिल्हेजिल्हासरासरीपेक्षा कमी परभणी५५%जळगाव५४%बीड, सोलापूर५२%लातूर५१%परभणी४७%