शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महाराष्ट्राच्या तीन जवानांसह २४ जणांचा हिमस्खलनात मृत्यू

By admin | Updated: January 28, 2017 04:35 IST

काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे.

अकोला /बीड : काश्मीरच्या गुरेझ भागात बुधवारपासून सुरू झालेल्या हिमस्खलनात लष्करातील मेजरसह २४ जवानांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे अकोल्याचे तर एक बीड जिल्ह्यातील आहे.गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोल्यातील पंचशील नगर भागातील आनंद गवई, मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे संजय खंडारे (२६) आणि बीडचे विकास समुद्रे यांचा मृत्यू झाला. आनंद हे २००९मध्ये सैन्यामध्ये दाखल झाले होते. आनंद यांच्या कुटुंबात आई-वडील आणि महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत मोठा भाऊ आहे. दोन आठवड्यांनी सुटीवर आल्यानंतर घरातील मंडळी आनंद यांच्या लग्नाची तयारी करणार होते; मात्र त्यांचा मृत्यू झाला. माना गावचे लष्कारात दाखल झाले होते. त्यांनी २१ जानेवारीपासून सुटी मागितली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे त्यांची सुटी रद्द झाली होती. बुधवारी झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील सुरेश खंदारे, आई सुलोचना, पत्नी शीतल, आठ महिन्यांचा मुलगा आदर्श, चार वर्षीय मुलगी परी असा परिवार आहे. बीड जिल्ह्याच्या धारूर येथील विकास पांडुरंग समुद्रे (२७) हे देखील या दुर्घटनेत मरण पावले. त्यांची आई जनाबाई व पत्नी प्रतिभा यांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही बातमी सांगितली नव्हती. विकास हेही २००९ साली सैन्यात भरती झाले होते. त्यांना परमेश्वर नावाचा छोटा भाऊ असून, दोन बहिणी आहेत. त्यांना दिव्या ही नऊ महिन्यांची कन्या आहे. वडील पांडुरंग समुद्रे यांचे दीड वर्षांपूर्वी आजारात निधन झाले.पुण्यातील एका खासगी कंपनीत चालक असलेल्या परमेश्वर यांना लष्करी अधिकाऱ्यांनी फोनवरून ही माहिती दिली. आईला उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांनी ही बातमी घरात कुणालाच सांगितली नाही. दुपारी वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकल्यानंतर त्यांच्या घराजवळ गावकरी गोळा झाले; मात्र आई आजारी असल्याने ही बातमी घरी न कळविण्याची विनंती परमेश्वर याने सर्वांना केली. वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी मे २०१६मध्ये विकास गावी आले होता. त्यानंतर त्यांना सुटी मिळाली नाही. १५ दिवसांपूर्वी ते फोनवरून आई, पत्नीशी बोलले होते. (प्रतिनिधी)हवामान सुधारताच जवानांचे मृतदेह मूळ गावी पाठविण्यात येतील, असे लष्कराने शुक्रवारी सांगितले. मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हवामान सुधारल्यानंतर ते त्यांच्या गावी रवाना करण्यात येतील, असे लष्करी प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. आणखी काही तास धोक्याचेकाश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत.