शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास पोस्टमॉर्टेमला ‘ना’

By admin | Updated: July 13, 2014 01:05 IST

सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने

मेडिकलचे न्यायवैद्यकशास्त्र विभाग : अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याची दिली कारणेसुमेध वाघमारे - नागपूरसूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात सांगितले. परंतु राज्यातील अनेक मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने (फॉरेन्सिक मेडिसीन) याला विरोध दर्शविला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारणे देऊन रात्रीचे पोस्टमॉर्टेम बंदच ठेवले आहे. पूर्वीच्या काळी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना विनाकारण या कायद्यामुळे त्रास होत होता. हा त्रास कमी व्हावा या उद्देशाने आव्हाड यांनी विधिमंडळात २४ ही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील सूचना राज्यातील सर्वच मेडिकल रुग्णालयांना पाठविण्यातही आल्या. परंतु रात्रीच्या वेळी हे गृह बंदच राहत असल्याची माहिती आहे. या विभागातील तज्ज्ञांच्या मते तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. तसे वैद्यकीय पुस्तकातही नमूद आहे. रुग्णालयाच्या नियमांमध्येही त्याची नोंद आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्या बाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. दुसरीकडे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच पोस्टमॉर्टेम करून देण्याचा आग्रह ठेवतात. यासाठी ते इतरांपर्यंत मृत्यूचा निरोप पोहचविण्याची आणि अंत्ययात्रेची तयारी करण्याची कारण देतात. यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, अपुरे मनुष्यबळ. यामुळे २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवणे अशक्यच आहे. एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्ट आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु अनेक मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्ट आणि तंत्रज्ञांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक मेडिकलच्या या विभागात दोन किंवा तीनपेक्षा जास्त यांची संख्या नाही. मंत्र्यांनी मनुष्यबळ दिल्यास आणि शवविच्छेदनगृहात व्यापक सोय करून दिल्यानंतरच हे शक्य आहे. मात्र, याचा विशेष असा फायदा होणार नाही हेही तेवढेच खरे आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.दहा वर्षांपूर्वीही घेतलेला निर्णय मागे घेतलादहा वर्षांपूर्वीही २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याच्या निर्णय झाला होता. त्यावेळी न्यायवैद्यक प्रकरणे हाताळणाऱ्या समितीने याला विरोध दर्शवून विविध कारण देऊन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. याशिवाय २०१०-११च्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही एका आमदाराने याची मागणी केली होती. परंतु नंतर ही मागणी मागे घेतल्याची माहिती आहे.