शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुसळधार कोसळणा-या पावसामुळे राज्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो, चिंता मिटली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 06:30 IST

राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर धरणांचे दरवाजे उघडावे लागतील, असे जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, ३,६४० व पावरहाउसमधून ७५० असे एकूण ४,३९० क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. वडीवळेमधून १३७, भाटघरमधून २,१६७ आणि मुळशीमधून ७००० क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.नाशिक जिल्ह्यात पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकला अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण, देवळा हे तालुके कोरडेच आहेत.>तर जायकवाडीचे दरवाजे उघडणारजायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. वरच्यासर्व धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे, धरणात १,९२५.३० दलघमी पाणीसाठा (क्षमता २,१७१ दलघमी) झाला आहे. ते २,१७१ च्या वर गेल्यास दरवाजे उघडावे लागतील. कोयना धरणाने २८०४.८६ दलघमीची पातळी (क्षमता २,८२६ दलघमी) ओलांडल्याने सहा दरवाजे उघडण्यात आल्याचे महाजन म्हणाले.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विदर्भात जोरदार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.>विदर्भात ‘पाणी’बाणी३३.३८ टक्के पाणीसाठा अमरावती विभागामधील धरणांत जमा आहे. तर ३५.६९ टक्के पाणीसाठा नागपूर विभागामधील धरणांत जमा आहे.