शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३ लहान धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दोनने जास्त आहे. धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ९५ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीने नागोठणे के.टी. बंधाऱ्याजवळ पूर पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये म्हसळात सर्वाधिक २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहे २११ मिमी, माथेरान १९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अलिबाग ८७ मिमी, पेण १८० मिमी, मुरुड ८८ मिमी, पनवेल २५ मिमी, उरण ४३ मिमी, कर्जत ४५ मिमी, खालापूर ४५, माणगाव ९८ मिमी, सुधागड ४३ मिमी, तळा २८९ मिमी, महाड ६९ मिमी, पोलादपूर ५८ मिमी, श्रीवर्धन ९० मिमी पाऊस पडला आहे. >भरलेली धरणेपेण तालुक्यातील आंबेघर धरण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानवील, उरण तालुक्यातील पुनाडे ही चार धरणे भरली आहेत. मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन- कुडकी, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत- साळोख, अवसारे, खालापूर- भिलवले, कोलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबे, बामणोली, उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.>४८ तासांत म्हसळ्यात सर्वाधिक पाऊसम्हसळा : गेल्या आठवड्यातील सततच्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. गेल्या ४८ तासांत सर्वाधिक २१४ मिमी पाऊस म्हसळा तालुक्यात पडला आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरु वारी व शुक्र वारी म्हसळ्यात पडलेल्या अतिवृष्टीने म्हसळा-गोरेगांव रस्त्यावरील वरच्या चिखलप व म्हसळा दुर्गवाडीदरम्यान दरड कोसळून काही तास वाहतूक बंद होती. बांधकाम खाते व नगरपंचायत यांनी जेसीबीच्या मदतीने मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यंदा शेतीचे पीक अतिशय चांगले आल्यामुळे शेतकरी सुखावला असताना गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बहुतेक शेती पूर्णपणे पसाळी असून लोंबीत दाणा तयार होत असताना एवढ्या पावसाची आवश्यकता नसते यामुळे पीक जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाताच्या लोंबीत दाणा तयार होण्यासाठी ऊन्ह आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते मात्र काही दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.