शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

जिल्ह्यातील २३ लहान धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दोनने जास्त आहे. धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ९५ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीने नागोठणे के.टी. बंधाऱ्याजवळ पूर पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये म्हसळात सर्वाधिक २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहे २११ मिमी, माथेरान १९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अलिबाग ८७ मिमी, पेण १८० मिमी, मुरुड ८८ मिमी, पनवेल २५ मिमी, उरण ४३ मिमी, कर्जत ४५ मिमी, खालापूर ४५, माणगाव ९८ मिमी, सुधागड ४३ मिमी, तळा २८९ मिमी, महाड ६९ मिमी, पोलादपूर ५८ मिमी, श्रीवर्धन ९० मिमी पाऊस पडला आहे. >भरलेली धरणेपेण तालुक्यातील आंबेघर धरण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानवील, उरण तालुक्यातील पुनाडे ही चार धरणे भरली आहेत. मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन- कुडकी, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत- साळोख, अवसारे, खालापूर- भिलवले, कोलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबे, बामणोली, उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.>४८ तासांत म्हसळ्यात सर्वाधिक पाऊसम्हसळा : गेल्या आठवड्यातील सततच्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. गेल्या ४८ तासांत सर्वाधिक २१४ मिमी पाऊस म्हसळा तालुक्यात पडला आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरु वारी व शुक्र वारी म्हसळ्यात पडलेल्या अतिवृष्टीने म्हसळा-गोरेगांव रस्त्यावरील वरच्या चिखलप व म्हसळा दुर्गवाडीदरम्यान दरड कोसळून काही तास वाहतूक बंद होती. बांधकाम खाते व नगरपंचायत यांनी जेसीबीच्या मदतीने मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यंदा शेतीचे पीक अतिशय चांगले आल्यामुळे शेतकरी सुखावला असताना गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बहुतेक शेती पूर्णपणे पसाळी असून लोंबीत दाणा तयार होत असताना एवढ्या पावसाची आवश्यकता नसते यामुळे पीक जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाताच्या लोंबीत दाणा तयार होण्यासाठी ऊन्ह आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते मात्र काही दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.