शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जिल्ह्यातील २३ लहान धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दोनने जास्त आहे. धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ९५ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीने नागोठणे के.टी. बंधाऱ्याजवळ पूर पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये म्हसळात सर्वाधिक २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहे २११ मिमी, माथेरान १९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अलिबाग ८७ मिमी, पेण १८० मिमी, मुरुड ८८ मिमी, पनवेल २५ मिमी, उरण ४३ मिमी, कर्जत ४५ मिमी, खालापूर ४५, माणगाव ९८ मिमी, सुधागड ४३ मिमी, तळा २८९ मिमी, महाड ६९ मिमी, पोलादपूर ५८ मिमी, श्रीवर्धन ९० मिमी पाऊस पडला आहे. >भरलेली धरणेपेण तालुक्यातील आंबेघर धरण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानवील, उरण तालुक्यातील पुनाडे ही चार धरणे भरली आहेत. मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन- कुडकी, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत- साळोख, अवसारे, खालापूर- भिलवले, कोलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबे, बामणोली, उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.>४८ तासांत म्हसळ्यात सर्वाधिक पाऊसम्हसळा : गेल्या आठवड्यातील सततच्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. गेल्या ४८ तासांत सर्वाधिक २१४ मिमी पाऊस म्हसळा तालुक्यात पडला आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरु वारी व शुक्र वारी म्हसळ्यात पडलेल्या अतिवृष्टीने म्हसळा-गोरेगांव रस्त्यावरील वरच्या चिखलप व म्हसळा दुर्गवाडीदरम्यान दरड कोसळून काही तास वाहतूक बंद होती. बांधकाम खाते व नगरपंचायत यांनी जेसीबीच्या मदतीने मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यंदा शेतीचे पीक अतिशय चांगले आल्यामुळे शेतकरी सुखावला असताना गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बहुतेक शेती पूर्णपणे पसाळी असून लोंबीत दाणा तयार होत असताना एवढ्या पावसाची आवश्यकता नसते यामुळे पीक जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाताच्या लोंबीत दाणा तयार होण्यासाठी ऊन्ह आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते मात्र काही दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.