शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३ लहान धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 24, 2016 02:40 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार ६८९ मिलीमीटर पाऊस पडल्याने २८ पैकी २३ लहान धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दोनने जास्त आहे. धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ९५ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीने नागोठणे के.टी. बंधाऱ्याजवळ पूर पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये म्हसळात सर्वाधिक २४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहे २११ मिमी, माथेरान १९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अलिबाग ८७ मिमी, पेण १८० मिमी, मुरुड ८८ मिमी, पनवेल २५ मिमी, उरण ४३ मिमी, कर्जत ४५ मिमी, खालापूर ४५, माणगाव ९८ मिमी, सुधागड ४३ मिमी, तळा २८९ मिमी, महाड ६९ मिमी, पोलादपूर ५८ मिमी, श्रीवर्धन ९० मिमी पाऊस पडला आहे. >भरलेली धरणेपेण तालुक्यातील आंबेघर धरण हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानवील, उरण तालुक्यातील पुनाडे ही चार धरणे भरली आहेत. मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहे- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन- कुडकी, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, कर्जत- साळोख, अवसारे, खालापूर- भिलवले, कोलोते-मोकाशी, डोणवत, पनवेल- मोरबे, बामणोली, उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.>४८ तासांत म्हसळ्यात सर्वाधिक पाऊसम्हसळा : गेल्या आठवड्यातील सततच्या मुसळधार पावसाने म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले मात्र सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. गेल्या ४८ तासांत सर्वाधिक २१४ मिमी पाऊस म्हसळा तालुक्यात पडला आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरु वारी व शुक्र वारी म्हसळ्यात पडलेल्या अतिवृष्टीने म्हसळा-गोरेगांव रस्त्यावरील वरच्या चिखलप व म्हसळा दुर्गवाडीदरम्यान दरड कोसळून काही तास वाहतूक बंद होती. बांधकाम खाते व नगरपंचायत यांनी जेसीबीच्या मदतीने मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. नगराध्यक्ष दिलीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.यंदा शेतीचे पीक अतिशय चांगले आल्यामुळे शेतकरी सुखावला असताना गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बहुतेक शेती पूर्णपणे पसाळी असून लोंबीत दाणा तयार होत असताना एवढ्या पावसाची आवश्यकता नसते यामुळे पीक जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भाताच्या लोंबीत दाणा तयार होण्यासाठी ऊन्ह आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची आवश्यकता असते मात्र काही दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.