शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

२३ हेक्टर भूखंड पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 23, 2014 03:51 IST

एकीकडे महानगरात जागेचा तुटवडा असताना म्हाडाच्या मालकीच्या मालवणीतील दादासाहेब गायकवाड नगरातील २३ हेक्टर विस्तीर्ण भूखंड गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पुनर्विकास व गृहप्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे

मुंबई : एकीकडे महानगरात जागेचा तुटवडा असताना म्हाडाच्या मालकीच्या मालवणीतील दादासाहेब गायकवाड नगरातील २३ हेक्टर विस्तीर्ण भूखंड गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पुनर्विकास व गृहप्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला पोलिसांच्या कुटुंबीयासाठी आरक्षित केल्यानंतर १७ वर्षे पडून राहिलेली ही जागा म्हाडाने स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठीची प्रक्रिया कागदावरच रेंगाळत राहिल्याने हा भूखंड पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत राहण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी दिलेल्या भूखंडापैकी २३ हेक्टरपैकी केवळ १.२ हेक्टरवर घरे बांधण्यात आली आहेत, तर उर्वरित २१.८ हेक्टर जागेचा ताबा स्वत:कडे घेऊन म्हाडाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणच्या प्रकल्पातून सुमारे ६ हजार घरे तयार होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र त्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता तातडीने करण्याची गरज आहे.मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्याच्या तुलनेत अपुऱ्या घरांमुळे त्याच्या किमती आकाशाला पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळविण्याचे स्वप्न दुरपास्त होत राहिले आहे. त्यामुळे म्हाडाने रखडलेल्या प्रकल्पाची तपासणी करून हे भूखंड पुन्हा ताब्यात घेऊन स्वत: योजना राबवाव्यात, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने मालवणीतील दादासाहेब गायकवाड नगरातील पोलीस गृहनिर्माण सोसायटीचा भूखंड स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. १९९७ साली गृहविभागाने पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी एसआरएच्या धर्तीवर गृह योजना बनविण्यासाठी शासनाकडे भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बनविलेल्या सोसायटीला मालवणी येथील २३ हेक्टर जागा त्यासाठी देण्यात आली. या जागेवर अडीच हजार कुटुंबे राहत होती. त्यापैकी १,४०० जण स्वमालकीची तर १,१०० घरे ट्रान्झिस्ट व पोलीस क्वाटर्सची होती. पोलीस सोसायटीच्या पुनर्विकासाला विरोध करीत काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याप्रकरणी २००७ ला दिलेल्या निकालामध्ये मूळ रहिवाशांना स्वतंत्रपणे बांधकामाची परवानगी देऊन त्यांना फेडरेशनमध्ये सहभागी करू नये असा आदेश दिला. मात्र दरम्यानच्या काळात पोलीस सोसायटीकडून १.२ हेक्टर जागेत अडीच एफएसआयने तब्बल ९०० फ्लॅट बांधले. चौधरीने त्यापैकी ७०० घरे ही परस्परे विकली. २०१० मध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शासनाने सोसायटीकडून अधिमूल्य आकारून २२३ गाळे परत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या गाळ्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मोठा होता. या वादावर उर्वरित २१.८ हेक्टर मोकळी जागा तशीच पडून राहिली होती. म्हाडाने ही जागा ताब्यात घेऊन स्वत: विकसित करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या सुस्ताईमुळे त्याबाबतची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे हा गृहप्रकल्प आणखी काही काळ रखडण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)