शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वाशीममध्ये २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 17:32 IST

शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे.

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत

वाशिम- प्रारंभी एफआरए प्रमाणपत्र आणि आता शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे. तथापि, गेल्या ७ वर्षांपासूनचे हे भिजत घोंगडे अद्याप कायम असल्याने तब्बल २२५ एकर जमिन सिंचनापासून वंचित राहत आहे. वनजमिनीवर सिंचन प्रकल्प उभारावयाचा असेल तर सर्वप्रथम वनविभागाचे त्यास फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट (एफआरए) अन्वये नाहरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार, जलसंपदा विभागाने वनविभागाच्या मुख्य कार्यालयाकडे सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात सलग पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे लक्ष पुरवून यासंदर्भात सन २०१५ मध्ये विविधांगी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून राज्यशासनाने आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली. ९ मार्च २००९ मध्ये मंजूर जयपूर लघूप्रकल्पास २ एप्रिल २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र मिळाले. मात्र, ६१ एकर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम त्यानंतर पुढे सरकू शकले नाही. १५ फेब्रूवारी २०१० मध्ये मंजूर शेलगांव संग्राहक आणि फाळेगांव संग्राहक प्रकल्पाला आॅक्टोबर २०१५ मध्ये ह्यएफआरएह्ण प्रमाणपत्र मिळाले; पण यामध्ये उद्भवलेल्या त्रुट्यांमुळे ३३ एकर सिंचन क्षमता निर्मितीच्या या दोन्ही प्रकल्पांची कामे रेंगाळली आहेत. १८ जून २०१० मध्ये मंजूर पारवाकोहर संग्राहक प्रकल्पास २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु ५२ एकर सिंचन क्षमता निर्माण होणाऱ्या या प्रकल्पास अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नाही. यासह १३ आॅक्टोबर २०१० मध्ये मंजूर रापेरी संग्राहक प्रकल्पाला १७ मार्च २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र प्राप्त झाले, ५ नोव्हेंबर २०१२ मध्ये मंजूर पांग्राबंदी लघूप्रकल्पास ५ मार्च २०१६ मध्ये हे प्रमाणपत्र मिळूनही या प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत. परिणामी, तब्बल २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित राहत असून आत्महत्याग्रस्त वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे दिसून येत आहे.