शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

वाशीममध्ये २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 17:32 IST

शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे.

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत

वाशिम- प्रारंभी एफआरए प्रमाणपत्र आणि आता शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे. तथापि, गेल्या ७ वर्षांपासूनचे हे भिजत घोंगडे अद्याप कायम असल्याने तब्बल २२५ एकर जमिन सिंचनापासून वंचित राहत आहे. वनजमिनीवर सिंचन प्रकल्प उभारावयाचा असेल तर सर्वप्रथम वनविभागाचे त्यास फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट (एफआरए) अन्वये नाहरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार, जलसंपदा विभागाने वनविभागाच्या मुख्य कार्यालयाकडे सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात सलग पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे लक्ष पुरवून यासंदर्भात सन २०१५ मध्ये विविधांगी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून राज्यशासनाने आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली. ९ मार्च २००९ मध्ये मंजूर जयपूर लघूप्रकल्पास २ एप्रिल २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र मिळाले. मात्र, ६१ एकर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम त्यानंतर पुढे सरकू शकले नाही. १५ फेब्रूवारी २०१० मध्ये मंजूर शेलगांव संग्राहक आणि फाळेगांव संग्राहक प्रकल्पाला आॅक्टोबर २०१५ मध्ये ह्यएफआरएह्ण प्रमाणपत्र मिळाले; पण यामध्ये उद्भवलेल्या त्रुट्यांमुळे ३३ एकर सिंचन क्षमता निर्मितीच्या या दोन्ही प्रकल्पांची कामे रेंगाळली आहेत. १८ जून २०१० मध्ये मंजूर पारवाकोहर संग्राहक प्रकल्पास २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु ५२ एकर सिंचन क्षमता निर्माण होणाऱ्या या प्रकल्पास अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नाही. यासह १३ आॅक्टोबर २०१० मध्ये मंजूर रापेरी संग्राहक प्रकल्पाला १७ मार्च २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र प्राप्त झाले, ५ नोव्हेंबर २०१२ मध्ये मंजूर पांग्राबंदी लघूप्रकल्पास ५ मार्च २०१६ मध्ये हे प्रमाणपत्र मिळूनही या प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत. परिणामी, तब्बल २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित राहत असून आत्महत्याग्रस्त वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे दिसून येत आहे.