शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

ठाणे जिल्ह्यातील २२४ जणांना डेंग्यू!

By admin | Updated: September 19, 2016 05:14 IST

महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले असून, १३ संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. डेंग्यूबाबतची जनजागृती मात्र नागरिकांचे जीव जात असतानाही अद्याप कागदावरच आहे. ऐन पावसाळ्यात मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकणगुन्या आजाराने जिल्ह्यात ८५४ जण त्रस्त आहेत. यामध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात असल्याचे आॅगस्टमध्ये सर्वाधिक उघडकीस आले. दगावलेल्यांमध्येदेखील डेंग्यू संशयित रुग्णांचा अधिक समावेश आहे. दगावलेल्या १३ संशयितांपैकी केवळ दोन डेंग्यूचे रुग्ण असल्याचा शोध आरोग्य यंत्रणेला घेता आला. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डासांचा शोध घेणे तर सोडाच जनजागृतीदेखील अद्याप झाली नसल्याची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. डेंग्यूच्या चक्रव्यूहात ठाणे महापालिकेच्या मुंब्रा-कौसा, शिळफाटा परिसरातील २७ रुग्ण आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ठाकूरवाडी, उमेशनगर, मंजूनाथनगर, तीसगांव, कोपररोड, शास्त्रीनगर, गांवदेवी या लोकवस्तीमध्ये ४१ रुग्ण आढलेले आहेत. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन डेंग्यूचे असल्याचे उघड झाले आहेत. ठाकूरवाडी परिसरातील लोकवस्तीत तर डेेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनात आले आहे. मलेरियाचादेखील एक रुग्ण नुकताच मोहने येथे दगावला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या लक्ष्मीनगर, खदान रोड भागात २६ रुग्ण आढळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील डेंग्यूसदृष्य रुग्ण महिनाभराच्या कालावधीपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याची वैद्यकीय क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. मीरा-भार्इंदरच्या नवघर आणि मीरा रोड परिसरात २३ रुग्ण सापडलेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरातील वालशिंद भागात ११ जण सापडले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मलेरियाने आझादनगरमधील एकाचे निधन झाले आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी, डोंळखांबमध्ये १०१ संशयीत रुग्ण आढळले. मलेरियाने सापगांवात एकाचा मृत्यू झाला.