शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ठाणे जिल्ह्यातील २२४ जणांना डेंग्यू!

By admin | Updated: September 19, 2016 05:14 IST

महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले असून, १३ संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. डेंग्यूबाबतची जनजागृती मात्र नागरिकांचे जीव जात असतानाही अद्याप कागदावरच आहे. ऐन पावसाळ्यात मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकणगुन्या आजाराने जिल्ह्यात ८५४ जण त्रस्त आहेत. यामध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात असल्याचे आॅगस्टमध्ये सर्वाधिक उघडकीस आले. दगावलेल्यांमध्येदेखील डेंग्यू संशयित रुग्णांचा अधिक समावेश आहे. दगावलेल्या १३ संशयितांपैकी केवळ दोन डेंग्यूचे रुग्ण असल्याचा शोध आरोग्य यंत्रणेला घेता आला. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डासांचा शोध घेणे तर सोडाच जनजागृतीदेखील अद्याप झाली नसल्याची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. डेंग्यूच्या चक्रव्यूहात ठाणे महापालिकेच्या मुंब्रा-कौसा, शिळफाटा परिसरातील २७ रुग्ण आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ठाकूरवाडी, उमेशनगर, मंजूनाथनगर, तीसगांव, कोपररोड, शास्त्रीनगर, गांवदेवी या लोकवस्तीमध्ये ४१ रुग्ण आढलेले आहेत. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन डेंग्यूचे असल्याचे उघड झाले आहेत. ठाकूरवाडी परिसरातील लोकवस्तीत तर डेेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनात आले आहे. मलेरियाचादेखील एक रुग्ण नुकताच मोहने येथे दगावला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या लक्ष्मीनगर, खदान रोड भागात २६ रुग्ण आढळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील डेंग्यूसदृष्य रुग्ण महिनाभराच्या कालावधीपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याची वैद्यकीय क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. मीरा-भार्इंदरच्या नवघर आणि मीरा रोड परिसरात २३ रुग्ण सापडलेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरातील वालशिंद भागात ११ जण सापडले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मलेरियाने आझादनगरमधील एकाचे निधन झाले आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी, डोंळखांबमध्ये १०१ संशयीत रुग्ण आढळले. मलेरियाने सापगांवात एकाचा मृत्यू झाला.