शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

२२ तालुके नक्षलमुक्त

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे.

पोलीस महासंचालकांकडून फेरआढावा : हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक ‘धक्का’ राजेश निस्ताने - यवतमाळ राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातून २२ तालुके वगळण्यात आले असून तेथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे शिक्कामोर्तब खुद्द पोलीस महासंचालकांनीच केले आहे. शासनाच्या ७ डिसेंबर २००४ च्या निर्णयानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील एकूण ३७ तालुके नक्षलप्रभावित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापोटी या नक्षल क्षेत्रात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. सुमारे १० वर्षांपासून सहा जिल्ह्यातील हजारो शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या भत्त्यांचा लाभ घेत आहेत. जानेवारी २०१४ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून नक्षलग्रस्त क्षेत्राचा फेरआढावा घेण्यात आला. तेव्हा ३७ पैकी तब्बल २२ तालुक्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कोणत्याही उघड अथवा छुप्या कारवाया नसल्याचे पोलिसांना आढळून आले. तसा अहवाल १७ आॅक्टोबर २०१४ रोजी महासंचालकांनी शासनाला सादर केला. त्यानुसार शासनाने २२ तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळले आहे. त्यासंबंधीचा आदेश गृहविभागाचे उपसचिव ब.दि. उमाटे यांच्या स्वाक्षरीने २६ डिसेंबर २०१४ रोजी जारी करण्यात आला. २२ तालुके वगळल्याने तेथील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक धक्का बसला आहे. यापुढे त्यांना एकस्तर वेतनश्रेणी आणि दरमहा दीड हजार रुपयांच्या भत्त्याला मुकावे लागणार आहे. कोणत्याही नक्षली हालचाली नसताना उपरोक्त २२ तालुक्यांना तो दर्जा आणि आर्थिक लाभ कशासाठी, असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून उपस्थित केला जात होता. हा नक्षल भत्ता म्हणजे शासकीय तिजोरीवर विनाकारण बोजा असल्याची ओरड केली जात होती. फेरआढाव्यात महासंचालकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्याने शासनाच्या तिजोरीवरील कोट्यवधीचा बोजा आता वाचणार आहे. फेरआढावा २०१६ मध्येपोलीस महासंचालकांच्या अहवालावर २२ तालुके वगळण्याची कार्यवाही शासनाने केली. ही स्थिती पुढील दोन वर्ष कायम राहणार आहे. कारण नक्षल प्रभावित क्षेत्राचा पुढील आढावा थेट जानेवारी २०१६ मध्ये पोलीस महासंचालकांमार्फत घेतला जाणार आहे.