शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

पठारात वादळी वाऱ्याने २२ घरांची पडझड

By admin | Updated: June 6, 2016 23:52 IST

संगमनेर/श्रीरामपूर : पठार भागात रविवारी रात्री तुफान वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: थैमान घातले. वादळात तब्बल २२ घरांची पडझड झाली.

श्रीरामपुरात मुलगा ठार : १४ जण जखमी : एक गाय दगावलीसंगमनेर/श्रीरामपूर : पठार भागात रविवारी रात्री तुफान वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: थैमान घातले. वादळात तब्बल २२ घरांची पडझड झाली. श्रीरामपूर येथे वादळाने उडालेला पत्रा लागून मुलगा ठार झाला. जनावरांच्या गोठ्याचे लोखंडी छत कोसळले. या दुर्घटनेत परप्रांतीय कामगारांसह एकूण १४ जण गंभीर जखमी झाले असून १ गाय दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पठार भागात अचानक सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला. वादळी वाऱ्यामुळे नांदूर खंदरमाळ, बाव पठार, बिरेवाडी, शिंदोडी व मांडवे परिसरात वादळी वाऱ्यामुळे गावातील काही घरांचे पत्रे उडाले. भिंतींची पडझड झाली, जनावरांच्या गोठ्याचे छत कासळले, झाडे पडली. वीज वाहक तारा, टेलिफोनच्या तारा तुटल्या, विजेचे खांब पडले. बाव पठार येथे जनावरांच्या गोठ्याचे छत अंगावर कोसळून राजेंद्र मुरलीधर करंजेकर (वय ५५) व तुकाराम राजेंद्र करंजेकर (वय २५) हे बापलेक गंभीर जखमी झाले. तसेच १ गाय दगावली असून ४ जखमी झाल्या आहेत. करंजेकर यांच्यावर एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर बिरेवाडी येथे महावितरणच्या विद्युत मनोऱ्याची उभारणी करणारे कामगार हेमलाल महातो, कैलासराम, भोलाराम, सरजूराम, दिनेश कमाली, तातेश्वरम व गणेशराम (सर्व रा. झारखंड) यांच्या अंगावर जुन्या घराची भींत पडून सर्वजण जखमी झाले. त्यातील हेमलाल महातो व कैलासराम यांची प्रकृती गंभीर आहे. शिंदोडी व मांडवे गावात घरांचे पत्रे उडाल्याने भाऊसाहेब बिरजू कोळपे, रेवजी गोविंद ढेंबरे, दत्तात्रय भास्कर ढेंबरे, बाळू तात्याबा ढेंबरे, विठ्ठल दत्तू बनकर हे जखमी झाले. वादळात बाबासाहेब भोसले व दत्तात्रय ढेंबरे यांचे ‘पॉली हाऊस’ व रेवजी ढेंबरे यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. देवगाव परिसरातही काही घरांचे पत्रे उडाले. शहरातील विठ्ठल मंदिरानजीकचे झाड उन्मळून पडले. घारगाव व बोटा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. वादळाने २२ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तलाठी आर. एम. मुळे, ग्रामसेवक ए. बी. कर्पे व कोतवाल बी. एम. धुळगंड यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पठार भागातील मोठ्या संख्येने चिमण्यांना जीव गमवावा लागला. सर्वत्र मेलेल्या चिमण्यांचा खच लागला होता. (प्रतिनिधी)