शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पठारात वादळी वाऱ्याने २२ घरांची पडझड

By admin | Updated: June 6, 2016 23:52 IST

संगमनेर/श्रीरामपूर : पठार भागात रविवारी रात्री तुफान वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: थैमान घातले. वादळात तब्बल २२ घरांची पडझड झाली.

श्रीरामपुरात मुलगा ठार : १४ जण जखमी : एक गाय दगावलीसंगमनेर/श्रीरामपूर : पठार भागात रविवारी रात्री तुफान वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: थैमान घातले. वादळात तब्बल २२ घरांची पडझड झाली. श्रीरामपूर येथे वादळाने उडालेला पत्रा लागून मुलगा ठार झाला. जनावरांच्या गोठ्याचे लोखंडी छत कोसळले. या दुर्घटनेत परप्रांतीय कामगारांसह एकूण १४ जण गंभीर जखमी झाले असून १ गाय दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पठार भागात अचानक सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला. वादळी वाऱ्यामुळे नांदूर खंदरमाळ, बाव पठार, बिरेवाडी, शिंदोडी व मांडवे परिसरात वादळी वाऱ्यामुळे गावातील काही घरांचे पत्रे उडाले. भिंतींची पडझड झाली, जनावरांच्या गोठ्याचे छत कासळले, झाडे पडली. वीज वाहक तारा, टेलिफोनच्या तारा तुटल्या, विजेचे खांब पडले. बाव पठार येथे जनावरांच्या गोठ्याचे छत अंगावर कोसळून राजेंद्र मुरलीधर करंजेकर (वय ५५) व तुकाराम राजेंद्र करंजेकर (वय २५) हे बापलेक गंभीर जखमी झाले. तसेच १ गाय दगावली असून ४ जखमी झाल्या आहेत. करंजेकर यांच्यावर एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर बिरेवाडी येथे महावितरणच्या विद्युत मनोऱ्याची उभारणी करणारे कामगार हेमलाल महातो, कैलासराम, भोलाराम, सरजूराम, दिनेश कमाली, तातेश्वरम व गणेशराम (सर्व रा. झारखंड) यांच्या अंगावर जुन्या घराची भींत पडून सर्वजण जखमी झाले. त्यातील हेमलाल महातो व कैलासराम यांची प्रकृती गंभीर आहे. शिंदोडी व मांडवे गावात घरांचे पत्रे उडाल्याने भाऊसाहेब बिरजू कोळपे, रेवजी गोविंद ढेंबरे, दत्तात्रय भास्कर ढेंबरे, बाळू तात्याबा ढेंबरे, विठ्ठल दत्तू बनकर हे जखमी झाले. वादळात बाबासाहेब भोसले व दत्तात्रय ढेंबरे यांचे ‘पॉली हाऊस’ व रेवजी ढेंबरे यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. देवगाव परिसरातही काही घरांचे पत्रे उडाले. शहरातील विठ्ठल मंदिरानजीकचे झाड उन्मळून पडले. घारगाव व बोटा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. वादळाने २२ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तलाठी आर. एम. मुळे, ग्रामसेवक ए. बी. कर्पे व कोतवाल बी. एम. धुळगंड यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पठार भागातील मोठ्या संख्येने चिमण्यांना जीव गमवावा लागला. सर्वत्र मेलेल्या चिमण्यांचा खच लागला होता. (प्रतिनिधी)