शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

२२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या

By admin | Updated: September 8, 2015 00:55 IST

दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात

गडचिरोली : दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात अद्यापही राज्य शासनाला यश आल्याचे दिसत नाही. १९८५ ते २०१५ या ३० वर्षांच्या कालावधीत २२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून हत्या झाली आहे.जिल्ह्यात १९८०च्या दशकात नक्षल चळवळीला सिरोंचा तालुक्यातून प्रारंभ झाला. परंतु २००५नंतर नक्षल आत्मसमर्पण योजनेला शासनस्तरावरून वेग देण्यात आला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढू लागली. आतापर्यंत ४७९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, १ हजार २६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील सहा वर्षांत नऊ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली. २०१०मध्ये ३ आत्मसमर्पितांची हत्या करण्यात आली. २०११मध्ये २, २०१४मध्ये १ व २०१५मध्ये २ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या जुन्या गावाकडे राहण्यासाठी जातात, ते लोक नक्षलवाद्यांचे लक्ष्य बनतात. त्यामुळे आत्मसमर्पण केलेले बरेच नक्षलवादी आपल्या परिवारासह जिल्हा व तालुका मुख्यालयात राहू लागले आहेत. तरीही त्यांच्या जीविताचा धोका सातत्याने वाढत आहेत. (प्रतिनिधी)