शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या

By admin | Updated: September 8, 2015 00:55 IST

दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात

गडचिरोली : दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात अद्यापही राज्य शासनाला यश आल्याचे दिसत नाही. १९८५ ते २०१५ या ३० वर्षांच्या कालावधीत २२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून हत्या झाली आहे.जिल्ह्यात १९८०च्या दशकात नक्षल चळवळीला सिरोंचा तालुक्यातून प्रारंभ झाला. परंतु २००५नंतर नक्षल आत्मसमर्पण योजनेला शासनस्तरावरून वेग देण्यात आला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढू लागली. आतापर्यंत ४७९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, १ हजार २६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील सहा वर्षांत नऊ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली. २०१०मध्ये ३ आत्मसमर्पितांची हत्या करण्यात आली. २०११मध्ये २, २०१४मध्ये १ व २०१५मध्ये २ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या जुन्या गावाकडे राहण्यासाठी जातात, ते लोक नक्षलवाद्यांचे लक्ष्य बनतात. त्यामुळे आत्मसमर्पण केलेले बरेच नक्षलवादी आपल्या परिवारासह जिल्हा व तालुका मुख्यालयात राहू लागले आहेत. तरीही त्यांच्या जीविताचा धोका सातत्याने वाढत आहेत. (प्रतिनिधी)