शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टँकरवर २१२ कोटींचा खर्च !

By admin | Updated: July 19, 2016 04:47 IST

यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

प्रदीप भाकरे,

अमरावती- यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. त्यातील जवळपास ९० कोटी रुपये टँकरवारीवर खर्च झाले. तर, ५० कोटींमधून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात आली.यावर्षीचा उन्हाळा राज्याला ‘दुष्काळदाह’ देऊन गेला. ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ राज्यभरात विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. अमरावती, नागपूर, नाशिक, कोकण व औरंगाबाद या विभागात पाणीटंचाई निवारणार्थ राबविलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने २१२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यातील ८९.२० कोटींचा निधी टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च झाला आहे. राज्यातील सहाही विभागांत मोठ्या प्रमाणात टँकरने पेयजलाचा पुरवठा करण्यात आला.राज्यात नोव्हेंबर ते जुलैच्या मध्यावधीपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक गाव वस्त्यांमध्ये १२ हजार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात मराठवाड्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ८९ कोटींच्या टँकरवारीमध्ये ५७.१८ कोटी औरंगाबाद विभागावर खर्च करण्यात आले. नाशिक विभागात २४.७६ कोटी तर अमरावती विभागात ६.५० कोटी रुपये खर्च झाला.<जीपीएस प्रणाली आवश्यकज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविली आहे, त्या टँकरच्या फेऱ्यांची नोंद करण्यात आली. अशा टँकर वाहतूकधारकांनाच देयके दिली जातील. पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली नाही किंवा जीपीएस प्रणाली बंद असेल अशा फेऱ्या बनावट ठरणार आहेत. अशा बनावट फेऱ्यांसाठी देयके दिली जाऊ नये, असे निर्देश पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने दिले आहेत.