शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

टँकरवर २१२ कोटींचा खर्च !

By admin | Updated: July 19, 2016 04:47 IST

यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

प्रदीप भाकरे,

अमरावती- यंदा उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना पेयजल पुरविण्यासाठी तब्बल २१२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. त्यातील जवळपास ९० कोटी रुपये टँकरवारीवर खर्च झाले. तर, ५० कोटींमधून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात आली.यावर्षीचा उन्हाळा राज्याला ‘दुष्काळदाह’ देऊन गेला. ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ राज्यभरात विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. अमरावती, नागपूर, नाशिक, कोकण व औरंगाबाद या विभागात पाणीटंचाई निवारणार्थ राबविलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी शासनाने २१२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यातील ८९.२० कोटींचा निधी टँकरने पाणीपुरवठा करण्यावर खर्च झाला आहे. राज्यातील सहाही विभागांत मोठ्या प्रमाणात टँकरने पेयजलाचा पुरवठा करण्यात आला.राज्यात नोव्हेंबर ते जुलैच्या मध्यावधीपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक गाव वस्त्यांमध्ये १२ हजार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात मराठवाड्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. ८९ कोटींच्या टँकरवारीमध्ये ५७.१८ कोटी औरंगाबाद विभागावर खर्च करण्यात आले. नाशिक विभागात २४.७६ कोटी तर अमरावती विभागात ६.५० कोटी रुपये खर्च झाला.<जीपीएस प्रणाली आवश्यकज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविली आहे, त्या टँकरच्या फेऱ्यांची नोंद करण्यात आली. अशा टँकर वाहतूकधारकांनाच देयके दिली जातील. पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या टँकरवर जीपीएस प्रणाली बसविलेली नाही किंवा जीपीएस प्रणाली बंद असेल अशा फेऱ्या बनावट ठरणार आहेत. अशा बनावट फेऱ्यांसाठी देयके दिली जाऊ नये, असे निर्देश पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने दिले आहेत.