शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विभागातील २०६३ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले ! ‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश

By admin | Updated: August 26, 2015 00:16 IST

दहावीची फेरपरीक्षा : कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल, राज्यात सातव्या स्थानी

कोल्हापूर : दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅक्टोबर-मार्च वारी थांबावी. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचावे म्हणून शासनाने घेतलेल्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागातील २०६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला. यात कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल आहे. यामध्ये विभाग राज्यात सातव्या स्थानी असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.विभागीय अध्यक्ष पायमल म्हणाले, दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने फेरपरीक्षा घेतली. तिचा चांगला परिणाम झाला. २१ जुलै ते ५ आॅगस्टदरम्यान ३४ केंद्रांवर एकूण ९ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. दरम्यान, यांपैकी २ हजार ६३ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २१.८० टक्के आहे. यात १ हजार ५१४ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांचे प्रमाण २०.९४ टक्के, तर ५४९ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे प्रमाण २४.५९ टक्के आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मिळालेला कालावधी लक्षात घेता निकालाची टक्केवारी चांगली आहे.राज्यातील ज्या विभागांचे मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत चांगले निकाल लागले होते, त्यांची टक्केवारी या निकालात कमी दिसत आहे.गोसावी म्हणाले, या फेरपरीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. यात कोल्हापूरमधील आठ व सांगलीतील चौघाजणांचा समावेश आहे. गुणपत्रिकांचे वाटप ३१ आॅगस्टला दुपारी तीन वाजता शाळांमध्ये होणार आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत १० सप्टेंबर आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे. या पत्रकार परिषदेस शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, मंडळाचे सहसचिव पी. डी. भंडारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेमुळे राज्यातील सुमारे ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच राज्य शासनाने दहावी व बारावीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकात गेली चौदा वर्षे दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मात्र ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेतली जात होती. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फेरपरीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापूर आवृत्तीत तीन भागांची वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती. कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन दहावी, १२ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्यासाठी निकालानंतर लगेच फेरपरीक्षा घेणे कसे गरजेचे आहे, हे त्यांना पटवून दिले होते. त्यावर याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तावडे यांनी दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळानेही तो मंजूर करून घेतला. या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेतली. तिचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. फेरपरीक्षेसाठी बसलेल्या राज्यातील एक लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ५१७ विद्यार्थी ११ वी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.जिल्हानिहाय निकाल असाजिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारीकोल्हापूर ७८७२३.४४सांगली७५१२४.८४सातारा ५२५१७.०३