शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील २०६३ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले ! ‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश

By admin | Updated: August 26, 2015 00:16 IST

दहावीची फेरपरीक्षा : कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल, राज्यात सातव्या स्थानी

कोल्हापूर : दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅक्टोबर-मार्च वारी थांबावी. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचावे म्हणून शासनाने घेतलेल्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागातील २०६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला. यात कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल आहे. यामध्ये विभाग राज्यात सातव्या स्थानी असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.विभागीय अध्यक्ष पायमल म्हणाले, दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने फेरपरीक्षा घेतली. तिचा चांगला परिणाम झाला. २१ जुलै ते ५ आॅगस्टदरम्यान ३४ केंद्रांवर एकूण ९ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. दरम्यान, यांपैकी २ हजार ६३ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २१.८० टक्के आहे. यात १ हजार ५१४ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांचे प्रमाण २०.९४ टक्के, तर ५४९ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे प्रमाण २४.५९ टक्के आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मिळालेला कालावधी लक्षात घेता निकालाची टक्केवारी चांगली आहे.राज्यातील ज्या विभागांचे मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत चांगले निकाल लागले होते, त्यांची टक्केवारी या निकालात कमी दिसत आहे.गोसावी म्हणाले, या फेरपरीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. यात कोल्हापूरमधील आठ व सांगलीतील चौघाजणांचा समावेश आहे. गुणपत्रिकांचे वाटप ३१ आॅगस्टला दुपारी तीन वाजता शाळांमध्ये होणार आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत १० सप्टेंबर आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे. या पत्रकार परिषदेस शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, मंडळाचे सहसचिव पी. डी. भंडारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेमुळे राज्यातील सुमारे ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच राज्य शासनाने दहावी व बारावीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकात गेली चौदा वर्षे दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मात्र ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेतली जात होती. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फेरपरीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापूर आवृत्तीत तीन भागांची वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती. कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन दहावी, १२ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्यासाठी निकालानंतर लगेच फेरपरीक्षा घेणे कसे गरजेचे आहे, हे त्यांना पटवून दिले होते. त्यावर याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तावडे यांनी दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळानेही तो मंजूर करून घेतला. या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेतली. तिचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. फेरपरीक्षेसाठी बसलेल्या राज्यातील एक लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ५१७ विद्यार्थी ११ वी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.जिल्हानिहाय निकाल असाजिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारीकोल्हापूर ७८७२३.४४सांगली७५१२४.८४सातारा ५२५१७.०३