पुणे : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने दुष्काळ निवारणासाठी शासनाने २०१७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी लवकरच जास्तीचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली.कृषी, मदत आणि पुनर्वसन व महसूल विभागाच्या आढावा बैठकीत खडसे बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजीक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते. खडसे म्हणाले, की यंदाचा दुष्काळ विभाजीत असून, पाणी टंचाई, चार टंचाई, रोजगार आदी समस्या गंभीर झाल्या आहेत. राज्याला खरीप हंगामसाठी १४ लाख ७७ हजार क्लिंटल विविध प्रकारच्या बियाणांची आवश्यता असते. यंदा मात्र कृषी विभागाकडे १७ लाख ९० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
दुष्काळासाठी अतिरिक्त २०१७ कोटींचा प्रस्ताव- खडसे
By admin | Updated: May 15, 2016 05:07 IST