शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

मेट्रोमधून ७८६ दिवसांत केला २0 कोटी जणांनी प्रवास

By admin | Updated: August 2, 2016 05:41 IST

मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होताच ती प्रवाशांच्या पसंतीस पडली. मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता मुंबई मेट्रो वन कडून वर्तविण्यात येत आहे. ४,५०० कोटी रुपये खर्चून घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रोचे भाडे सुरुवातीला दहा रुपये ठेवण्यात आल्याने, रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने, आकडा आणखीच वाढत गेला. त्यानंतर, मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्यात आली असली, तरी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली नाही. आतापर्यंत मेट्रोतून २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली. कामाच्या दिवशी मेट्रोतून दररोज ३ लाख ४0 हजार प्रवासी ये-जा करतात. जुलैमध्ये १८ टक्के प्रवासी वाढले असल्याचे सांगण्यात आले. ४00 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती. (प्रतिनिधी)>400 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती.