शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पीककर्जासाठी २०० कोटी मिळणार

By admin | Updated: June 25, 2016 03:40 IST

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘नाबार्ड’ कडे २०० कोटींची हमी देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

औरंगाबाद : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘नाबार्ड’ कडे २०० कोटींची हमी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकांना पीककर्जासाठी पाच- सहा दिवसांत २०० कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शुक्रवारी न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठात दिली. यापूर्वीच्या सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, खते आणि बी-बियाणे याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गिरासे यांनी खंडपीठात लेखी माहिती सादर केली.राज्यात ६७ लाख ९ हजार ३४ अल्पभूधारक, तर ४० लाख ५२ हजार ३१७ अत्यल्प भूधारक आहेत. तसेच २९ लाख ३७ हजार ६१३ इतर शेतकरी आहेत. असे एकूण १ कोटी ३६ लाख ९८ हजार ९६५ शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्याचा राज्य शासन प्रयत्न करीत आहे. खरीप कर्जासाठी शासनाला ३७ हजार ४४७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. १५ जून २०१६ पर्यंत त्यापैकी १६ हजार ४२२ कोटींचे म्हणजे ८० टक्क्यांपैकी जवळपास ४४ टक्के कर्ज वाटप झाले आहे. यावर्षी १ लाख ४१ हजार ६६२ नवीन शेतकऱ्यांना ८९९ कोटी रुपयांचे पीककर्ज दिले आहे. (प्रतिनिधी)१७.९२ लाख क्ंिवटल बियाणे उपलब्धखरिपासाठी यावर्षी १४.९९ लाख क्ंिवटल बियाणांची आवश्यकता आहे. सध्या बाजारात १७.९२ लाख क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी ११.९८ लाख क्ंिवटल बियाणे शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरेदी केले आहे. बियाणांच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरापासून विभागीय आणि जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरापर्यंत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरीय समिती तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तसेच राज्याला ११.१४ लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता आहे. केंद्र शासन १३.०२ लाख मे. टन खत पुरविणार असून त्यापैकी ५ लाख ४ हजार मे. टन खत राज्य शासनास मिळाले आहे, असे गिरासे यांनी सांगितले.