शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

‘जुन्या इमारतींसाठी २०० कोटींचा निधी’

By admin | Updated: April 2, 2016 01:29 IST

अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची

मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची योजना, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दोन वेळा लॉटरी आदींचा समावेश आहे.२०१६-१७च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले की, सरकारने सेस इमारतींसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईसाठी उदार धोरण राबवत असताना मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी २०० कोटी रु पये खर्च करणार आहे. पाच वर्षांत म्हाडा, एमएमआरडीए आदी सहा एजन्सीमार्फत जवळपास ६ लाख ७३५ घरे उभारली जाणार आहेत. यातही मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून १ लाख परवडणारी घरे उभारली जाणार आहे. बीडीडी चाळींच्या योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पोलिसांना तेथेच मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत. मात्र हा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे त्याला पूर्णत्व देता आले नाही. धारावीचा प्रकल्पही गती घेत आहे. १६ विकासकांनी त्यात सहभाग घेतला असून, त्याचे ई-टेंडरिंगही झाले आहे. धारावीतील एकही पारंपरिक उद्योग प्रकल्पाच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही. गिरणी कामगारांसाठी या वर्षात २ लॉटऱ्या काढल्या जाणार आहेत. त्याच्या कृती समितीबरोबर ४-५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसह बैठक होऊन त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. मुंबईतील संक्रमण शिबिरांच्या बाबतीत ५ विकसकांनी सुमारे ८० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यांच्या विरोधात खटले दाखल केले असून, विशेष मोहिमेद्वारे कारवाई पूर्ण केली जाईल, असेही मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)