शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘जुन्या इमारतींसाठी २०० कोटींचा निधी’

By admin | Updated: April 2, 2016 01:29 IST

अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची

मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या घरांसाठी उदार धोरण आखत विविध योजनांची घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यात जुन्या घरांसाठी २०० कोटी रु पये, बी.डी.डी. चाळींची योजना, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दोन वेळा लॉटरी आदींचा समावेश आहे.२०१६-१७च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले की, सरकारने सेस इमारतींसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईसाठी उदार धोरण राबवत असताना मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी २०० कोटी रु पये खर्च करणार आहे. पाच वर्षांत म्हाडा, एमएमआरडीए आदी सहा एजन्सीमार्फत जवळपास ६ लाख ७३५ घरे उभारली जाणार आहेत. यातही मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून १ लाख परवडणारी घरे उभारली जाणार आहे. बीडीडी चाळींच्या योजना पूर्ण केल्या जाणार आहेत. चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पोलिसांना तेथेच मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत. मात्र हा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे त्याला पूर्णत्व देता आले नाही. धारावीचा प्रकल्पही गती घेत आहे. १६ विकासकांनी त्यात सहभाग घेतला असून, त्याचे ई-टेंडरिंगही झाले आहे. धारावीतील एकही पारंपरिक उद्योग प्रकल्पाच्या बाहेर जाऊ दिला जाणार नाही. गिरणी कामगारांसाठी या वर्षात २ लॉटऱ्या काढल्या जाणार आहेत. त्याच्या कृती समितीबरोबर ४-५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसह बैठक होऊन त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. मुंबईतील संक्रमण शिबिरांच्या बाबतीत ५ विकसकांनी सुमारे ८० कोटी ५० लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यांच्या विरोधात खटले दाखल केले असून, विशेष मोहिमेद्वारे कारवाई पूर्ण केली जाईल, असेही मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)