शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

गारपीटग्रस्तांना २०० कोटींची मदत

By admin | Updated: June 3, 2015 03:55 IST

राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत

मुंबई : राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. हा निधी शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात येणार असून, या निधीतून कोकण विभागातील आंबा व काजू उत्पादकांना ६९ कोटी ८५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. विशेषत: नाशिक भागातील द्राक्षे, खान्देशातील केळी आणि फळभाज्या, विदर्भ वगळता उर्वरित भागातील रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. (विशेष प्रतिनिधी)