शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

२० वर्षाचे पाप धुवायला वेळ लागणार : सुभाष देशमुख

By admin | Updated: June 6, 2017 18:38 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : गेल्या वीस वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय झाले याची सर्वांना माहितीच आहे़ आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे़ एकाच दिवशी सर्व काही घडत नाही़ मात्र गेल्या २० वर्षात झालेली पापे धुवायला वेळ लागेल अशा शब्दात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आणि हमी भावाबाबत सरकार सकारात्मक आहे़ आतापर्यंत या सरकारने शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले होते़ शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सकारात्मक आहे़ त्यावर चर्चाअंती लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल मात्र शेतकऱ्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले़ विरोधक शेतकरी आंदोलनाला फूस लावण्याच काम करीत असल्याचाही आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यांनी २० वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केले असते तर ही वेळ आलीच नसती़ असे सुनावले़ राजकारणात अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आडून आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप सहकारमंत्र्यांनी केला़ मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. चर्चसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. तसंच अल्पभूधारकांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केल्याचंही सुभाष देशमुखांनी सांगितलं.दरम्यान, शेतकऱ्यांनी दुध व शेतीमालाची नासाडी न करता हे अन्न गोरगरिबांना वाटावं. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना, अनाथांना द्यावं अशी सुचना केली़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचं आवाहन करणार असल्याचंही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले़