शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

२० वर्षाचे पाप धुवायला वेळ लागणार : सुभाष देशमुख

By admin | Updated: June 6, 2017 18:38 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : गेल्या वीस वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय झाले याची सर्वांना माहितीच आहे़ आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे़ एकाच दिवशी सर्व काही घडत नाही़ मात्र गेल्या २० वर्षात झालेली पापे धुवायला वेळ लागेल अशा शब्दात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आणि हमी भावाबाबत सरकार सकारात्मक आहे़ आतापर्यंत या सरकारने शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले होते़ शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सकारात्मक आहे़ त्यावर चर्चाअंती लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल मात्र शेतकऱ्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले़ विरोधक शेतकरी आंदोलनाला फूस लावण्याच काम करीत असल्याचाही आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यांनी २० वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केले असते तर ही वेळ आलीच नसती़ असे सुनावले़ राजकारणात अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आडून आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप सहकारमंत्र्यांनी केला़ मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. चर्चसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. तसंच अल्पभूधारकांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केल्याचंही सुभाष देशमुखांनी सांगितलं.दरम्यान, शेतकऱ्यांनी दुध व शेतीमालाची नासाडी न करता हे अन्न गोरगरिबांना वाटावं. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना, अनाथांना द्यावं अशी सुचना केली़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचं आवाहन करणार असल्याचंही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले़