शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

२० वर्षाचे पाप धुवायला वेळ लागणार : सुभाष देशमुख

By admin | Updated: June 6, 2017 18:38 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : गेल्या वीस वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय झाले याची सर्वांना माहितीच आहे़ आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे़ एकाच दिवशी सर्व काही घडत नाही़ मात्र गेल्या २० वर्षात झालेली पापे धुवायला वेळ लागेल अशा शब्दात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आणि हमी भावाबाबत सरकार सकारात्मक आहे़ आतापर्यंत या सरकारने शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले होते़ शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सकारात्मक आहे़ त्यावर चर्चाअंती लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल मात्र शेतकऱ्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले़ विरोधक शेतकरी आंदोलनाला फूस लावण्याच काम करीत असल्याचाही आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यांनी २० वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केले असते तर ही वेळ आलीच नसती़ असे सुनावले़ राजकारणात अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आडून आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप सहकारमंत्र्यांनी केला़ मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. चर्चसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. तसंच अल्पभूधारकांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केल्याचंही सुभाष देशमुखांनी सांगितलं.दरम्यान, शेतकऱ्यांनी दुध व शेतीमालाची नासाडी न करता हे अन्न गोरगरिबांना वाटावं. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना, अनाथांना द्यावं अशी सुचना केली़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचं आवाहन करणार असल्याचंही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले़